AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप विजेत्या वुमन्स ब्लाइंड क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’

वुमन्स ब्लाइंड क्रिकेट टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने जेतेपद पटकावलं. यानंतर सर्वच स्तरातून संघावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. या जेतेपदानंतर भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण संघाला आपल्या हाताने मिठाई भरवली.

टी20 वर्ल्डकप विजेत्या वुमन्स ब्लाइंड क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदींची 'मन की बात'
टी20 वर्ल्डकप विजेत्या वुमन्स ब्लाइंड क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदींची 'मन की बात'Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Nov 27, 2025 | 8:47 PM
Share

भारतीय महिला ब्लाइंड क्रिकेट संघाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेपाळला 7 गडी राखून पराभूत केलं. यासह भारतीय संघाने पहिल्या टी20 ब्लाइंग महिला वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरलं. या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही हे विशेष… त्यामुळे सर्वच स्तरातून भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विजयानंतर संघाचं कौतुक केलं होतं. संघाची मेहनत, टीमवर्क आणि दृढ निश्चयाबाबत पाठीवरती कौतुकाची थाप दिली होती. त्यानंतर गुरुवारी भारतीय महिला क्रिकेट संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानाच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण संघाला हाताने मिठाई भरवून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. महिला ब्लाइंड संघाने बॅटवर सह्या करत ती बॅट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साइन केलेला बॉल दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेतेपदानंतर ट्विट करत लिहिलं होतं की, “पहिला महिला ब्लाइंट टी20 विश्वचषक जिंकल्याबद्दल संघाचे अभिनंदन. त्याहूनही कौतुकास्पद गोष्ट म्हणजे संपूर्ण मालिकेत ते अपराजित राहिले. ही खरोखरच एक ऐतिहासिक क्रीडा कामगिरी आहे. खेळाडूंनी कठोर परिश्रम, टीमवर्क आणि दृढनिश्चयाचे उत्तम उदाहरण मांडले आहे. प्रत्येक खेळाडू एक विजेता आहे. संघाला त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा. ही कामगिरी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल.”ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेने संयुक्तपणे आयोजित केली होती. या स्पर्धेचे सामने भारतातील दिल्ली आणि बेंगळुरू आणि श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळले गेले.

महिला ब्लाइंड टी20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी करत 114 धावा केल्या. हे लक्ष्य भारतीय संघाने 12 षटकात पूर्ण केलं. भारताकडून फुला सरीने सर्वाधिक नाबाद 44 धावा केल्या. करूणाने 27 चेंडूत एकूण 42 धावांची खेळी केली.

Follow Us
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....