AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 5 खेळाडू पहिल्यांदा खेळणार, तर गतविजेत्या संघातील 7 खेळाडूंचा पत्ता कापला

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गतविजेत्या संघातील किती खेळाडू या संघात आहेत. तसेच नव्याने कोण खेळत याची चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात या दोन वर्षात संघात काय बदल झाला ते..

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 5 खेळाडू पहिल्यांदा खेळणार, तर गतविजेत्या संघातील 7 खेळाडूंचा पत्ता कापला
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 5 खेळाडू पहिल्यांदा खेळणार, तर गतविजेत्या संघातील 7 खेळाडूंचा पत्ता कापलाImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Dec 20, 2025 | 8:37 PM
Share

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 15 सदस्यांची निवड केली असून राखीव खेळाडूंची घोषणा केलेली नाही. कारण हा वर्ल्डकप भारतातच होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. विदेशात असता तर राखीव खेळाडूंची गरज तात्काळ भासू शकते म्हणून त्याची घोषणा केली जाते, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या संघातून शुबमन गिलला डावलण्यात आलं आहे. तर अक्षर पटेलच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा सोपण्यात आली आहे. अशी सर्व चर्चा रंगली असताना या संघात पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप खेळणारे खेळाडू कोणते? तसेच गतविजेत्या संघात असलेल्या किती खेळाडू आहेत. याची चर्चा रंगली आहे. मागच्या वर्ल्डकप स्पर्धेतील सात खेळाडू या संघात आहे. तर पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप खेळणाऱ्या पाच खेळाडू आहेत. चला जाणून घेऊयात..

अभिषेक शर्मासह रिंकु सिंह हे पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळणार आहेत. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकु सिंह, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप खेळणार आहेत. त्यामुळे या खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची नामी संधी आहे. दुसरीकडे इशान किशन दोन वर्षानंतर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार आहे. यापूर्वी इशान किशन 2021 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळला होता. त्यामुळे त्याला ही स्पर्धा काही नवी नाही.वरूण चक्रवर्तीच्या बाबतीतही असंच आहे. त्याने 2021 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळला आहे. या स्पर्धेत सर्वांच्या नजरा या ओपनर अभिषेक शर्मावर असतील.

गतविजेत्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 7 खेळाडू या संघात नाहीत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर निवृत्ती घेतली. त्यामुळे त्यांच्या निवडीचा प्रश्नच येत नाही. या शिवाय चार खेळाडूंना यावेळी डावलण्यात आलं आहे. यात ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल, युजवेंद्र चहल यांना संघात स्थान मिळालं नाही. मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उपकर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर होती. मात्र यावेळी ही धुरा अक्षर पटेलकडे देण्यात आली आहे.

Follow Us
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा