AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026 : भारत पाकिस्तान उपांत्य की अंतिम फेरीत भिडणार? जाणून घ्या आयसीसीचा नियम

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आहे. शेवटच्या सामन्यातील निकालानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे. पण या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली तर काय?

T20 WC 2026 : भारत पाकिस्तान उपांत्य की अंतिम फेरीत भिडणार? जाणून घ्या आयसीसीचा नियम
T20 WC 2026 : भारत पाकिस्तान उपांत्य की अंतिम फेरीत भिडणार? जाणून घ्या आयसीसीचा नियमImage Credit source: PTI
| Updated on: Feb 28, 2026 | 5:10 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांनी स्थान पक्कं केलं आहे. पण अजून दोन संघांसाठी भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात चुरस आहे. या चार पैकी दोन संघांची उपांत्य फेरीत वर्णी लागणार आहे. भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरी गाठणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानने विजयासोबत नेट रनरेटचं गणित सोडवलं तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. अन्यथा न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीत जाईल. समजा भारत आणि पाकिस्तान या दोन संघांचं उपांत्य फेरीचं गणित सुटलं. तर हे दोन संघ उपांत्य कि अंतिम फेरीत भिडणार? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. चला जाणून घेऊयात आयसीसीचा नियम काय आहे ते

भारत पाकिस्तान सामना कसा होणार?

सुपर 8 फेरीतील गट 1 मध्ये भारत, तर गट 2 मध्ये पाकिस्तानचा संघ आहे. भारत आणि पाकिस्तानने उपांत्य फेरीत जागा मिळवली तरी हे दोन संघ आपल्या गटात दुसऱ्या स्थानावर राहतील. त्यामुळे उपांत्य फेरीत या दोन्ही संघाची लढत होणार नाही. कारण गट 1 मधील टॉप असलेल्या दक्षिण अफ्रिकेचा सामना गट 2 मधील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानशी होईल. तर गट 2 मधील टॉप असलेल्या इंग्लंडचा सामना गट 1 मधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताशी होईल. पण पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धचा सामना 64 धावांनी किंवा दिलेलं आव्हान 13.1 षटकात पूर्ण आवश्यक आहे.

भारत पाकिस्तान अंतिम फेरीत भिडणार!

जर तरच सर्व गणितं सुटली आणि भारत पाकिस्तानने उपांत्य फेरीत विजय मिळवला. तर या दोन संघाची लढत अंतिम फेरीत होईल. 2007 टी20 वर्ल्डकपनंतर दुसऱ्यांदा हे दोन संघ अंतिम फेरीत भिडू शकतात. पण हे गणित सुटलं तरच.. तसेच हा सामना कोलंबोत होईल. कारण पाकिस्तान भारतात सामना खेळणार नाही. दरम्यान, भारताने पाकिस्तानला साखळी फेरीत 61 धावांनी पराभू केलं होतं.

Follow Us
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; 872 गावे जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; 872 गावे जलमय, लाखो नागरिकांवर संकट

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..