AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs Pak : भारत-पाकिस्तान मॅचचा धडकी भरवणारा जाहिरातीचा दर, सामना न झाल्यास प्रचंड नुकसान!

सध्या टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाल आहे. येत्या 15 फेब्रवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. परंतु या सामन्याबाबत अद्यापतरी अनिश्चितताच आहे. त्यामुळे ब्रॉडकास्टर्सचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

IND Vs Pak : भारत-पाकिस्तान मॅचचा धडकी भरवणारा जाहिरातीचा दर, सामना न झाल्यास प्रचंड नुकसान!
ind vs pak matchImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 08, 2026 | 9:16 PM
Share

India Vs Pakistan Match : टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. या वर्ल्ड कपमध्ये विजयी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. टी-20 विश्वचषकात प्रत्येक वेळी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वांनाच उत्सुकता असते. यावेळी मात्र भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अनिश्चितता आहे.येत्या 15 फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार की नाही, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलसोबत चर्चा चालू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तान सामना जगभरात कोट्यवधी लोक पाहतात. त्यामुळेच या सामन्यातील प्रत्येक जाहिरातीचा दरही तेवढाच जास्त असतो.

प्रत्येक 10 सेकंदांसाठी किती रुपये आकारले जातात?

हा दर नेमका किती असतो ते जाणून घेऊ या. भारत-पाकिस्तान सामना असेल तर जाहिरातीचा दर गगनाला भिडतो. 2025 आणि 2026 साली भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यांकडे पाहता प्रत्येक सामन्यात 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 14 लाख रुपये ते 50 लाख रुपयांपर्यंतचा दर असू शकतो. विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी यासारख्या सामन्यांत भारत-पाकिस्तान सामना चालू असेल तर जाहिरातीचा दर जास्तच वाढतो. आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान प्रत्येक 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 14 ते 16 लाख रुपये दर आकारला होता.

सामना न झाल्यास किती कोटींचे नुकसान होणार?

आजकाल फक्त टीव्हीच नव्हे तर डिजिटल प्लॅटफॉर्म तसेच कनेक्ट टीव्हीदेखील जाहिरातीसाठी महत्त्वाचे मंच आहेत. या मंचावरही जाहिरात द्यायची असेल तर प्रत्येक 10 सेकंदासाठी 25 ते 30 लाख रुपये घेतले जातात. दरम्यान, येत्या 15 फेब्रुवारी रोजीचा भारत-पाकिस्तान सामना न झाल्यास ब्रॉडकास्टर्सचे मोठे नुकसान होऊ शकते.नुकसानीचाहा आकडा थेट 200 ते 250 कोटीच्या घरात जाऊ शकतो. त्यामुळे आता हा सामना होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

15 फेब्रुवारी रोजी मॅच किती वाजता होणार?

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत अजूनही अनिश्चितताच आहे. परंतु वेळापत्रकाप्रमाणे हा सामना येत्या 15 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता चालू होणार आहे. या दिवशी रविवार असणार आहे. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?