Team India : श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?

Team India 1st T20i Captain : टीम इंडियाचा सर्वात पहिला टी 20I कर्णधार कोण होता? सर्वाधिक टी 20i सामन्यात कोणत्या कर्णधारने भारताचं नेतृत्व केलंय? जाणून घ्या

Team India : श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?
Shreyas Iyer Team India
Image Credit source: @ShreyasIyer15
| Updated on: Jul 03, 2026 | 1:00 AM

श्रेयस अय्यर भारताचा 15 वा टी 20I कर्णधार म्हणून नेतृत्व करत आहे. श्रेयसने आयर्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेतून कर्णधारपदाची सूत्र स्वीकारली. श्रेयस भारताला त्याच्या नेतृत्वात आयर्लंड विरुद्ध मालिका जिंकून देण्यात अपयशी ठरला. भारताला आयर्लंडकडून 0-2 अशा एकतर्फी फरकाने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. तर दुसरा सामना हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे. या निमित्ताने आपण भारताचं नेतृत्व करणाऱ्या याआधीच्या 14 कर्णधारांबाबत जाणून घेणार आहोत.

टी 20I टीम इंडियाचा पहिला कॅप्टन कोण?

टीम इंडियाने 2006 साली पहिला टी 20I सामना खेळला होता. या पहिल्या सामन्यात वीरेंद्र सेहवाग याने भारताचं नेतृत्व केलं होतं. या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी याला कर्णधार करण्यात आलं होतं. महेंद्रसिंह धोनी याने त्याच्या नेतृत्वात आयसीसीचा पहिलाच टी 20I वर्ल्ड कप जिंकून दिला होता.

महेंद्रसिंह धोनी भारताचं सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करणारा कर्णधार राहिला. धोनीसह एकूण 14 कर्णधारांनी भारताचं किती टी 20I सामन्यांत नेतृत्व केलं? हे आपण जाणून घेऊयात.

भारताचे टी 20i कर्णधार, किती सामन्यांत नेतृत्व?

वीरेंद्र सेहवाग : 1 सामना

महेंद्रसिंह धोनी : 72 सामने

सुरेश रैना : 3 सामने

अजिंक्य रहाणे : 2 सामने

विराट कोहली : 50 सामने

रोहित शर्मा : 62 सामने

शिखर धवन : 3 सामने

ऋषभ पंत : 5 सामने

हार्दिक पंड्या : 16 सामने

केएल राहुल : 2 सामने

जसप्रीत बुमराह : 2 सामने

ऋतुराज गायकवाड : 3 सामने

सूर्यकुमार यादव : 52 सामने

शुबमन गिल : 5 सामने

टीम इंडियाचे टी 20i वर्ल्ड कप विजेते कर्णधार

भारताला आतापर्यंत एकूण 3 कर्णधारांनी टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. त्यापैकी दोघे हे मुंबईकर आहेत. महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर 2024 साली रोहित शर्मा याने भारताला टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला. तर सूर्याने रोहितचा वारसा यशस्वीपणे कायम ठेवत भारताला 2026 साली वर्ल्ड चॅम्पियन केलं. त्यानंतर सूर्याकडून कर्णधारपद काढून ते श्रेयसला देण्यात आलं आहे. आता श्रेयस भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी कशी सांभाळतो हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Follow Us