AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : रोहितला चांगलं खेळण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली? हिटमॅन म्हणाला..

Rohit Sharma On Gully Cricket : एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी 14 मार्च रोजी टी 20I मुंबई लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली. यावेळेस रोहित शर्मा याने गल्ली क्रिकेटवर बोलताना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Rohit Sharma : रोहितला चांगलं खेळण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली? हिटमॅन म्हणाला..
Rohit Sharma On Gully CricketImage Credit source: t20mumbai
| Updated on: Mar 14, 2026 | 10:17 PM
Share

मुंबईने भारताला आणि क्रिकेट विश्वाला एकसेएक आणि तोडीसतोड क्रिकेटपटू दिले. मुंबईने क्रिकेटला सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, संजय मांजरेकर, विनोद कांबळी आणि यासारखे अनेक स्टार खेळाडू दिले. त्यामुळेच मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हणतात. आताच्या काळात या दिग्गज मुंबईकर खेळाडूंचा वारसा रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, सर्फराज खान, मुशीर खान, तुषार देशपांडे, अर्थव अंकोलेकर, सिद्धेश लाड, आयुष म्हात्रे या आणि यासारखे अनेक खेळाडू पुढे नेत आहेत. हे खेळाडू अनेकदा मुंबईत गल्ली क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे प्रत्येक मुंबईकर खेळाडूच्या नसानसात गल्ली क्रिकेट आहे. सचिनने तर गल्ली क्रिकेटमुळे आपण स्ट्रेट ड्राईव्ह अचूकपणे मारू शकलो, असं म्हटलं होतं. अशात आता रोहित शर्मा यानेही गल्ली क्रिकेटबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित काय म्हणाला?

“माझ्यासाठी गल्ली क्रिकेट खेळणं हे महत्वाचे होतं. शाळेतून घरी आल्यानंतर संध्याकाळी 2 तास गल्ली क्रिकेट खेळायला मिळायचं. त्यानंतर थोडंसा अभ्यास करावा लागायचा. गल्ली क्रिकेटमध्ये कोणी ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड नव्हतं. पण आपला मित्र चांगला खेळला तर वाटायचं आपण का नाही तसं खेळु शकत? तेव्हापासून चांगल खेळायची ऊर्जा निर्माण झाली. त्यानंतर शाळेत क्लबमध्ये जॉईन होऊन क्रिकेट खेळायला सुरुवात केली”, असं रोहितने म्हटलं. मुंबईत टी 20I मुंबई लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली. यावेळेस रोहितने गल्ली क्रिकेटबाबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला.

रोहितने सांगितला मजेशीर किस्सा

रोहितने या कार्यक्रमात बोलताना गल्ली क्रिकेटमधील गंमतीचा उल्लेख करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. “गल्ली क्रिकेटमध्ये ज्याने काच फोडली त्यानेच नुकसान भरपाई देणं योग्य नाही”,असं रोहितने म्हटलं.

“सामना जिंकण्यासाठी काहीही करा, असं कॅप्टनने सांगितलेलं असतं. मग काच फोडली तर सर्व टीमने भरपाई दिली पाहिजे. टीमने भरपाई दिली नाहीतर ज्याच्या वडिलांकडे जास्त पैसे त्यांनी दिले पाहिजे”, असंही रोहितने म्हटलं.

रोहितची प्रथम श्रेणी कारकीर्द

दरम्यान रोहित देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. रोहितने आतापर्यंत 129 फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 129 सामन्यांमधील 209 डावांत एकूण 9 हजार 318 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान नाबाद 309 धावांची खेळी केली होती. रोहितने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 29 शतकं आणि 38 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच रोहितने 24 विकेट्सही मिळवल्या आहेत.

Follow Us
सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामो
सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामो.
प्रहारचा शिंदे गटामध्ये विलय?; कडूंच्या एन्ट्रीने समीकरणे बदलणार तर...
प्रहारचा शिंदे गटामध्ये विलय?; कडूंच्या एन्ट्रीने समीकरणे बदलणार तर....
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...