AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India Captaincy | विंडिज सीरिजनंतर टीम इंडियाचा कॅप्टन बदलणार!

Team Indian Captain | टीम इंडियाचा कॅप्टन बदलण्यात यावा, अशी मागणी wtc final 2023 पराभवापासून करण्यात येत होती.

Team India Captaincy | विंडिज सीरिजनंतर टीम इंडियाचा कॅप्टन बदलणार!
| Updated on: Jul 20, 2023 | 10:44 PM
Share

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध विंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. विंडिजने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. कॅप्टन रोहित शर्मा आणि आणि यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीने लंच ब्रेकपर्यंत 131 रन्सची पार्टनरशीप केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं पूर्ण केली. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. यानंतर उभयसंघात एकदिवसीय आणि टी 20 मालिका होणार आहे. यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन बदलू शकतो. बीसीसीआय अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यामुळे एकच चर्चा सुरु झाली आहे.

टीम इंडिया विंडिज दौऱ्यानंतर आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20 मालितका खेळणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहेत. रोहित शर्मा सातत्याने क्रिकेट खेळतोय. त्यामुळे या मालिकेसाठी आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर रोहितला विश्रांती मिळणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे टीम इंडियाची कॅप्टन्सी कोण करणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

कॅप्टन्सी कोणाकडे?

आयर्लंड विरुद्धच्या या मालिकेसाठी रोहित शर्मा याच्यासह टीम इंडियाचा टी 20 कर्णधार हार्दिक पंड्या, शुबमन गिल आणि इशान किशन या चौघांना विश्रांती देण्यात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी कर्णधारपदाचा पेच आणखी वाढला आहे.

टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेणार?

हार्दिक पंड्या टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू आहे. तो बॉलिंग, फिल्डिंग आणि बॅटिंग अशा तिन्ही आघाड्यांवर कामगिरी करतो. त्यामुळे निवड समिती हार्दिकबाबत वर्ल्ड कप पाहता जोखीम घेणार नाही.

” आतापर्यंत काहीही निश्चित नाही. विंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेनंतर हार्दिक काय स्थितीत आहे, यावरुन सर्व ठरेल कारण टीम इंडियाला मोठा प्रवास करायचा आहे. वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर खेळाचा ताण कमी करणं महत्वाचं आहे. तसेच वर्ल्ड कपमध्ये हार्दिक उपकर्णधारही असेल”, अशी वृत्त पीटीआयने बीसीसीआ सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

टीम इंडियाचा आयर्लंड दौरा

दरम्यान टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्याला 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील एकूण 3 सामने हे अनुक्रमे 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेत टीम इंडियाकडून युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया टी 20 मालिका वेळापत्रक

पहिला सामना, आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, 18 ऑगस्ट.

दुसरा सामना, आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, 20 ऑगस्ट.

तिसरा सामना, आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, 23 ऑगस्ट.

Follow Us
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...