AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuma Vihari | हनुमा विहारीचे भाजप खासदाराला सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाला…

बाबुल सुप्रियो यांनी हनुमा विहारीच्या संथ खेळीवरून ट्विट करत टीका केली होती.

Hanuma Vihari | हनुमा विहारीचे भाजप खासदाराला सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाला...
हनुमा विहारीने भाजप खासदार बाबुल सुप्रियोला प्रत्युत्तर दिलं आहे.
| Updated on: Jan 14, 2021 | 11:16 AM
Share

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India) यांच्याकील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. हा सामना अनिर्णित राखण्यात हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि रवीचंद्रन अश्विन या जोडीचे महत्वाचे योगदान राहिले. हनुमा विहारीने भाजप खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच अश्विननेही फिरकी घेतली आहे. हनुमाने बाबुल सुप्रियाच्या ट्विटला प्रत्युतर देत टोला लगावला आहे. (team india hanuma vihari critisized bjp mp babul supriyo)

सुप्रिया यांनी हनुमा विहारीवर संथ खेळीवरुन टीका केली होती. या ट्विटमध्ये सुप्रिया यांच्याकडून हनुमाचं आडनाव लिहिताना चुक केली. सु्प्रिया यांनी विहारीऐवजी बिहारी लिहिलं. यावरुन विहारीने सुप्रियो यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. तसेच हनुमाने सुप्रिया यांच्या ट्विटखाली आपलं अचूक नाव लिहित सणसणीत प्रत्युतर दिलं. या प्रत्युतराचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. तसेच अश्विनने हा स्क्रीनशॉट शेअर करत सुप्रिया यांची फिरकी घेतली.

विहारीने दिलेलं प्रत्युत्तर

नक्की प्रकरण काय?

तिसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 300 पेक्षा अधिक धावांची आवश्यकता होती. पुजारा आणि पंत ही सेट जोडी बाद झाली. त्यामुळे अश्विन आणि विहारी या जोडीने सामना अनिर्णित करण्याच्या उद्देशाने खेळी केली. या दोघांनी कांगारुंना चांगलचं रडवलं. दोघांनी मैदानात घट्ट पाय रोवून झुंजार खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी पाचव्या दिवसखेर 259 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. यामध्ये हनुमा विहारीने 161 चेंडूत 23 धावा तर, रवीचंद्रन अश्विनने 128 चेंडूत 39 धावा केल्या.

सुप्रियोंनी विहारीच्या संथ खेळीवरुन ही टीका केली होती. “हा अत्याचार आहे. हनुमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारले नाही, तर त्याने क्रिकेटची सुद्धा हत्या केली. विजयाकडे पर्याय म्हणून न बघणे, मग तो कितीही दुरापास्त असू दे, असे करणे म्हणजे गुन्हा आहे”, असे सुप्रियो यांनी आपल्या ट्विटमध्ये आहे. मात्र, “आपल्याला क्रिकेटमधील काहीही कळत नाही”, असी पुस्तीही खासदार महोदयांनी ट्विटमध्ये जोडली आहे.

बाबुल सुप्रियो यांच ट्विट

“जर हनुमा विहारीने खेळपट्टीवर फक्त उभे राहण्यापेक्षा वाईट चेंडूंवर चौकार मारले असते तर कदाचित भारताला ऐतिहासिक विजय मिळाला असता. कोणी अपेक्षा केली नव्हती, ते पंतने करुन दाखवले. हनुमा विहारी खेळपट्टीवर स्थिरावला होता. त्यामुळे त्याने खराब चेंडूंवर चौकार ठोकायला पाहिजे होते”, असेही बाबुल सुप्रियो म्हणाले होते.

दरम्यान 4 सामन्यातील मालिकेत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाने प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. तर तिसरा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1ने बरोबरीत आहे. या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

तू क्रिकेटची हत्या केलीस; भाजपचे खासदार महाशय हनुमा विहारीवर भडकतात तेव्हा…

(team india hanuma vihari critisized bjp mp babul supriyo)

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.