AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडिया तिसऱ्यांदा? आयसीसीकडून आकडेवारीच जाहीर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी चुरशीची लढाई दिसत आहे. असं असताना भारतीय संघ अंतिम फेरी गाठणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या भारतीय संघ अव्वल स्थानी असून अंतिम फेरीसाठी प्रमुख दावेदार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडिया तिसऱ्यांदा? आयसीसीकडून आकडेवारीच जाहीर
| Updated on: Sep 12, 2024 | 6:08 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं तिसरं पर्व सुरु आहे. आतापर्यंतच्या दोन पर्वात टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली. पण दोन्ही वेळेस पदरी अपयश पडलं. एकदा न्यूझीलंडने आणि एकदा ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडिया तिसऱ्या पर्वासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असल्याने प्रबळ दावेदार आहे. आता बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. या मालिकेनंतर चित्र आणखी स्पष्ट होईल. असं असताना भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्याची किती संधी आहे, याबाबतचा अपडेट आयसीसीकडून देण्यात आले आहेत. भारताने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी 6 सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. भारताची विजयी टक्केवारी 68.52 इतकी असून अव्वल स्थानी आहे. अजून भारतीय संघाला 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. यापैकी पाच सामने भारतात आणि पाच सामने भारताबाहेर होणार आहेत. भारताने हे सर्व सामने जिंकले तर विजयी टक्केवारी ही 85.09 इतकी होईल. पण असं शक्य नाही.

भारताचे दहा पैकी 2 सामने बांगलादेशसोबत, 3 सामने न्यूझीलंडसोबत आणि पाच सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार आहेत. जर टीम इंडिया भारतात होणाऱ्या पाच सामन्यात विजय मिळवला, तर विजयी टक्केवारी ही 79.96 इतकी होईल. ही विजयी टक्केवारी अंतिम फेरी गाठण्यासाठी बस होईल. त्यामुळे टीम इंडिया अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाही अंतिम फेरी गाठू शकते. ऑस्ट्रेलियाचे 7 सामने शिल्लक आहेत. त्यापैकी 5 सामने भारताशी होणार आहेत. तर 2 सामने श्रीलंकेत खेळणार आहे. जर ऑस्ट्रेलियाने सर्व सामने जिंकले तर विजयी टक्केवारी ही 76.32 इतकी होईल. न्यूझीलंडही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे. न्यूझीलंडचा संघ 8 कसोटी सामने खेळणार आहे. जर न्यूझीलंडने सर्व सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 76.32 पर्यंत पोहोचेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देता येईल.

दुसरीकडे, बांगलादेशचा संघ सर्व सामने जिंकला तर 72.92 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. श्रीलंकेचा संघ 69.23 टक्क्यांपर्यंत, इंग्लंडचा संघ 57.95 टक्क्यांपर्यंत, दक्षिण अफ्रिकेचा संघ 69.44 टक्क्यांपर्यंत, पाकिस्तानचा संघ 59.52 टक्क्यांपर्यंत आणि वेस्ट इंडिजचा संघ 43.59 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ वगळता इतर संघांचं अंतिम फेरीत पोहोचणं कठीण आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.