AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडिया तिसऱ्यांदा? आयसीसीकडून आकडेवारीच जाहीर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी चुरशीची लढाई दिसत आहे. असं असताना भारतीय संघ अंतिम फेरी गाठणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या भारतीय संघ अव्वल स्थानी असून अंतिम फेरीसाठी प्रमुख दावेदार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडिया तिसऱ्यांदा? आयसीसीकडून आकडेवारीच जाहीर
| Updated on: Sep 12, 2024 | 6:08 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं तिसरं पर्व सुरु आहे. आतापर्यंतच्या दोन पर्वात टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली. पण दोन्ही वेळेस पदरी अपयश पडलं. एकदा न्यूझीलंडने आणि एकदा ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडिया तिसऱ्या पर्वासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असल्याने प्रबळ दावेदार आहे. आता बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. या मालिकेनंतर चित्र आणखी स्पष्ट होईल. असं असताना भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्याची किती संधी आहे, याबाबतचा अपडेट आयसीसीकडून देण्यात आले आहेत. भारताने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी 6 सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. भारताची विजयी टक्केवारी 68.52 इतकी असून अव्वल स्थानी आहे. अजून भारतीय संघाला 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. यापैकी पाच सामने भारतात आणि पाच सामने भारताबाहेर होणार आहेत. भारताने हे सर्व सामने जिंकले तर विजयी टक्केवारी ही 85.09 इतकी होईल. पण असं शक्य नाही.

भारताचे दहा पैकी 2 सामने बांगलादेशसोबत, 3 सामने न्यूझीलंडसोबत आणि पाच सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार आहेत. जर टीम इंडिया भारतात होणाऱ्या पाच सामन्यात विजय मिळवला, तर विजयी टक्केवारी ही 79.96 इतकी होईल. ही विजयी टक्केवारी अंतिम फेरी गाठण्यासाठी बस होईल. त्यामुळे टीम इंडिया अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाही अंतिम फेरी गाठू शकते. ऑस्ट्रेलियाचे 7 सामने शिल्लक आहेत. त्यापैकी 5 सामने भारताशी होणार आहेत. तर 2 सामने श्रीलंकेत खेळणार आहे. जर ऑस्ट्रेलियाने सर्व सामने जिंकले तर विजयी टक्केवारी ही 76.32 इतकी होईल. न्यूझीलंडही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे. न्यूझीलंडचा संघ 8 कसोटी सामने खेळणार आहे. जर न्यूझीलंडने सर्व सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 76.32 पर्यंत पोहोचेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देता येईल.

दुसरीकडे, बांगलादेशचा संघ सर्व सामने जिंकला तर 72.92 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. श्रीलंकेचा संघ 69.23 टक्क्यांपर्यंत, इंग्लंडचा संघ 57.95 टक्क्यांपर्यंत, दक्षिण अफ्रिकेचा संघ 69.44 टक्क्यांपर्यंत, पाकिस्तानचा संघ 59.52 टक्क्यांपर्यंत आणि वेस्ट इंडिजचा संघ 43.59 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ वगळता इतर संघांचं अंतिम फेरीत पोहोचणं कठीण आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.