AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया तयार नाही…’, हेड कोच गंभीरचा खेळाडूंना थेट इशारा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी आता अवघ्या तीन महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. पण गौतम गंभीर यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. वर्ल्डकप स्पर्धेसाठीची तयारी पूर्ण झाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे.

'टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया तयार नाही...', हेड कोच गंभीरचा खेळाडूंना थेट इशारा
'टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया तयार नाही...', हेड कोच गंभीरचा खेळाडूंना थेट इशाराImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Nov 10, 2025 | 3:54 PM
Share

भारताचा टी20 वर्ल्डकप दिशेने प्रवास सुरु झाला आहे. या स्पर्धेपूर्वीची लिटमस टेस्ट सुरु आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका भारताने 2-1 ने जिंकली. आता दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिके खेळण्यास सज्ज आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी या दोन मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहेत. कारण या मालिकेतूनच खेळाडूंची टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा तीन महिन्यांनी भारतात होणार आहे. मागच्या पर्वात भारताने जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे यंदा वर्ल्डकप भारतात होणार असल्याने जेतेपदासाठी फेव्हरेट मानला जात आहे. पण असं असताना क्रीडाप्रेमींची हेड कोच गौतम गंभीरच्या वक्तव्याने धाकधूक वाढली आहे. गौतम गंभीरच्या मते, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम पूर्णपणे तयार नाही. त्यांच्या या वक्तव्याने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.

बीसीसीआयसोबत बोलताना हेड कोच गौतम गंभीर यांनी मन की बात सांगितलं. गौतम गंभीर म्हणाला की, ‘ही एक अतिशय पारदर्शक ड्रेसिंग रूम आहे, एक अतिशय प्रामाणिक ड्रेसिंग रूम आहे आणि आम्हाला ती तशीच हवी आहे. मला वाटते की टी20 विश्वचषकापर्यंत आम्ही जिथे पोहोचू इच्छितो तिथे पोहोचलो नाही. आशा आहे की, खेळाडूंना तंदुरुस्त राहण्याचे महत्त्व समजेल. आम्हाला जिथे पोहोचायचे आहे तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला अजूनही तीन महिने आहेत.’ गौतम गंभीर यांच्या वक्तव्यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की टीम इंडियाला अजून मेहनत घ्यावी लागणार आहे. तर आणि तरच टीम इंडिया टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद मिळवू शकेल.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 9 डिसेंबरपासून पाच सामन्यांची टी20 मालिका असणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघा टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 21 जानेवारीपासून सुरु होणार असून 31 जानेवारीला संपेल. त्यानंतर टीम इंडिया थेट फेब्रुवारी महिन्यात टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यास उतरणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार यात काही शंका नाही. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची उणीव भासणार आहे. ही उणीव आता शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांना भरून काढावी लागणार आहे. गोलंदाजीवरही आणखी लक्ष द्यावं लागणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...