IND vs SL 2nd Test: दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये बदल होणार? कोणाला मिळणार संधी आणि का?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. संघात एक बदल जवळपास निश्चित मानला जात आहे.

India vs Sri Lanka 2nd Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवून 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसर्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील काही त्रुटी दूर करून संघ पुन्हा नव्या आव्हानासाठी तयार असणार आहे. यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. फिरकीपटू कुलदीप यादवच्या जागी अष्टपैलू सारांश जैनला संधी मिळण्याची शक्यता आहे. याचं कारण खेळाडूला नुसतं बदलणं नाही तर श्रीलंकन संघाची ताकद आहे. त्यामुळे हा बदल होण्याची दाट शक्यता आहे. चला जाणून घेऊयात सारांश जैनचं नाव कुलदीप यादवच्या जागी का असावं? असं वाटतं.
सारांश जैनला संधी देण्याचं कारण की…
श्रीलंकेच्या फलंदाजीचा क्रम पाहता कुलदीप यादवच्या जागी सारांश जैनचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. श्रीलंकेजवळ डावखुरे फलंदाज आहे. मधल्या फळीत सोनल दिनुषा, कामिंदु मेंडिस आणि निरोशन डिकवेल यासारखे डावखुरे फलंदाज आहेत. तर याच्या उलट टीम इंडिया मागच्या सामन्यात तीन डावखुऱ्या फिरकीपटूंसह मैदानात उतरली होती. यात मानव सथार, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव होता. मानव सुथार आणि रवींद्र जडेजाने चांगली कामगिरी केली. पण कुलदीप यादव काही चालला नाही. त्यामुळे कुलदीपच्या जागी सारांश जैनला संधी देण्याबाबत विचार असल्याचं बोललं जात आहे. कारण सारांश ऑफ स्पिनर आहे आणि टीम इंडियाला त्याच्यामुळे फायदा होऊ शकतो. इतकंच काय तर सारांश फलंदाजीही चांगली करतो.
सारांश जैनची क्रिकेट कारकीर्द
सारांश जैनकडे प्रथम दर्जा क्रिकेट खेळण्याचा चांगला अनुभव आहे. सारांशने 54 सामन्यात 188 विकेट काढल्या आहेत. त्यासोबत सारांशने फलंदाजीतही योगदान दिलं आहे. त्याने 2223 धावा केल्या असून यात 2 शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. सारांशने रणजी ट्रॉपी 2025-26 मध्ये मध्य प्रदेशसाठी खेळताना 10 सामन्यात 30 विकेट काढल्या होत्या. इतकंच काय तर 518 धावाही केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळेच मध्य प्रदेशचा संघ बाद फेरीपर्यंत मजल मारू शकला होता. त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच त्याची निवड भारतीय कसोटी संघात झाली आहे. आता कोलंबोत त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळते की नाही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
