AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत टीम इंडियाचे किती गुण? अंतिम फेरीसाठी अजून किती सामने जिंकावे लागणार? जाणून घ्या

भारताने बांगलादेशला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने धोबीपछाड दिला आहे. या विजयासह भारताचं गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम आहे. तसेच या विजयामुळे भारताच्या विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. आता भारताला आठ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी किती सामन्यात विजय मिळवला तर अंतिम सामन्यात स्थान पक्क होईल ते जाणून घेऊयात

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत टीम इंडियाचे किती गुण? अंतिम फेरीसाठी अजून किती सामने जिंकावे लागणार? जाणून घ्या
Image Credit source: BCCI
| Updated on: Oct 01, 2024 | 1:59 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. बांगलादेशला अपेक्षेप्रमाणे धोबीपछाड दिला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने विजय मिळवला आणि व्हाईटवॉश दिला. यासह भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबर फायदा झाला आहे. पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताची विजयी टक्केवारी 71.67 इतकी होती. आता बांगलादेशला दुसऱ्या सामन्यातही पराभूत केल्याने विजयी टक्केवारी 74.24 इतकी झाली आहे. त्यामुळे भारताचं अव्वल स्थान तर पक्कं आहे. आता उर्वरित आठ सामन्यात भारताला विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे. दुसरीकडे, बांगलादेशचं पराभवामुळे नुकसान झालं आहे. बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर तिसरं स्थान गाठलं होतं. पण दोन सामन्यांच्या मालिकेत पराभव झाल्याने विजयी टक्केवीरी 39.29 वरून 34.37 इतकी झाली आहे. तसेच पाचव्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. भारताला आता न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

भारताला अंतिम फेरीत आपले स्थान पक्के करण्यासाठी या 8 सामन्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. भारताला त्यांच्या शेवटच्या 8 पैकी 5 सामने जिंकावे लागतील.बांगलादेशसोबतच्या मालिकेनंतर भारत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे. भारतासमोर खरे आव्हान ऑस्ट्रेलियाचं असणार आहे. कारण 5 सामन्यांच्या कसोटी मालिका ऑस्ट्रेलियात असणार आहे. त्यामुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली, तर त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त दोन विजयांची आवश्यकता असेल.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी 11 ते 15 जून दरम्यान लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.

भारताने दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. पण दोन्ही वेळेस भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-21 मध्ये अंतिम फेरीत न्यूझीलंडशी सामना झाला होता. तेव्हा न्यूझीलंडने भारताला 8 विकेटने पराभूत केलं होतं. त्यानंतर 2021-2023 या स्पर्धेत पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली. तेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला. तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात ट्रेव्हिस हेडने 163 धावांची खेळी केली होती.

Follow Us
एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, राज्याच्या राजकारणात मोठं घडणार? थेट
एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, राज्याच्या राजकारणात मोठं घडणार? थेट...
चेंबूर दुर्घटनेवर मनसे आक्रमक! BMC दोषींना वाचवतंय?
Sandeep Deshpande | चेंबूर दुर्घटनेवर मनसे आक्रमक! BMC दोषींना वाचवतंय? संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप; मनसेचा आंदोलनाचा इशारा
डिलिमिटेशन बाबत ठाकरे गटाचा निर्णय बदलणार? संजय राऊतांच्या विधानाने
Sanjay Raut | डिलिमिटेशन बाबत ठाकरे गटाचा निर्णय बदलणार? संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण
ही शांतता स्मशान शांततेकडे नेईल; राज ठाकरेंची केंद्रावर बोचरी टीका!
ही शांतता स्मशान शांततेकडे नेईल; राज ठाकरेंची केंद्रावर बोचरी टीका! सोनम वांगचुकांच्या आंदोलनाला मनसेचा जाहीर पाठिंबा
मोठी खळबळ! 'त्या' कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट
मोठी खळबळ! 'त्या' कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट एकनाथ शिंदेंकडे धाव...
हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात; कोल्हापुरात नवी..
मोठी राजकीय घडामोड! हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात; कोल्हापुरात नवी राजकीय समीकरणं?
फडणवीस-तटकरे भेटीची सुनेत्रा पवारांना कल्पनाच नव्हती?
NCP | राष्ट्रवादीत इनसाईड स्टोरी! फडणवीस-तटकरे भेटीची सुनेत्रा पवारांना कल्पनाच नव्हती? राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात….

Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात…

Sachin Ahir : उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेत आलेले सचिन अहिर नाखुश, एकनाथ शिंदेंच्या कानावर घातली नाराजी.

Sachin Ahir : उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेत आलेले सचिन अहिर नाखुश, एकनाथ शिंदेंच्या कानावर घातली नाराजी

‘कपडे काढणं गरजेचं असेल तर ते का काढू नये’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या विधानाने खळबळ.

‘कपडे काढणं गरजेचं असेल तर ते का काढू नये’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या विधानाने खळबळ

येळकोट येळकोट जय मल्हार.. जेजुरीत बांदेकर कुटुंबाने घेतले खंडोबाचे आशीर्वाद;  Photo समोर.

येळकोट येळकोट जय मल्हार.. जेजुरीत बांदेकर कुटुंबाने घेतले खंडोबाचे आशीर्वाद; Photo समोर

BMC ची ताज महाल पॅलेस हॉटेलला 22 कोटींची नोटीस ; काय आहे प्रकरण ?.

BMC ची ताज महाल पॅलेस हॉटेलला 22 कोटींची नोटीस ; काय आहे प्रकरण ?

मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का?.

मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का?