AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला पराभूत न करताच मिळणार थेट अंतिम फेरीचं तिकीट, कसं काय ते जाणून घ्या

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. पण या सामन्यात भारताला अतिरिक्त फायदा मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना न खेळताच अंतिम फेरीचं तिकीट मिळू शकतं, कसं काय ते जाणून घ्या सविस्तर

... तर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला पराभूत न करताच मिळणार थेट अंतिम फेरीचं तिकीट, कसं काय ते जाणून घ्या
| Updated on: Mar 03, 2025 | 1:34 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदापासून टीम इंडिया दोन विजय दूर आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करताच टीम इंडियाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. पण यासाठी टीम इंडियाला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असणार आहे. आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं पारडं कायमच जड दिसून आलं आहे. इतकंच काय तर वनडे क्रिकेटमध्येही ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा वरचढ ठरली आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 151 सामने झाले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 84 सामन्यात, तर भारताने 54 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 10 सामन्यांचा निकाल लागला नाही. आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताच्या स्वप्नांवर पाणी टाकलं आहे. आतापर्यंत दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेत 18 वेळा आमनेसामने आलेत. यात ऑस्ट्रेलियाने 10 तर भारताने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना निकालाविना संपला आहे. आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत आठ वेळा भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले आहेत. यात दोन्ही संघांनी 4-4 अशी बाजी मारली आहे. मागच्या तीन बाद फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं आहे. असं असताना या उपांत्य भारताला एक फायदा आहे. जर तसं समीकरण जुळून आलं तर भारताला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळू शकतं.

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतील साखळी फेरीच्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात बांग्लादेश, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केलं आहे. यासह अ गटात भारतीय संघ टॉपला आहे. तर ब गटात ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला पराभूत केलं. त्यानंतर दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि प्रत्येकी एक गुण मिळाला. 4 गुणांसह ऑस्ट्रेलिया ब गटात दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया असा उपांत्य फेरीत सामना होणार आहे.

उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया या सामन्यात पाऊस पडेल अशी काही शक्यता नाही. पण जर पावसाने हजेरी लावली आणि 4 मार्चला सामना पूर्ण झाला नाही तर राखीव दिवशी सामना खेळला जाईल. 5 मार्च हा भारत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस आहे. पण राखीव दिवशीही सामना झाला नाही तर भारताला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. कारण भारतीय संघ साखळी फेरीतील अ गटात टॉपला आहे.

Follow Us
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग
हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप
Anjali Damania | हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप अनावर
एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं
Big Breaking | एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं गुपित
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह...
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
Omraje Nimbalkar | ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील अचानक 'मातोश्री'वर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
दुर्दैव! हायकोर्टात जाणार...पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला... पवनराजे निंबाळकर प्रकरणात कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?