AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज, आयसीसीकडून मिळाली अशी बातमी

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. सलग दोन सामने जिंकून आधीच भारताने मालिका खिशात घातली आहे. टीम इंडिया या मालिकेनंतर थेट दुबईला रवाना होणार आहे. यापूर्वी आयसीसीकडून टीम इंडियाला आनंदाची बातमी मिळाली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज, आयसीसीकडून मिळाली अशी बातमी
Image Credit source: BCCI
| Updated on: Feb 11, 2025 | 3:49 PM
Share

टीम इंडिया पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर परतली आहे. वनडे आणि कसोटी टीम इंडियाची मागच्या काही मालिकांमध्ये पिछेहाट झाली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला सूर गवसणं महत्त्वाचं होतं. असं असताना भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याचा चॅम्पियन्स ट्रॉफीत फायदा होणार यात काही शंका नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसरा सामना अजून बाकी आहे. हा सामना भारताने आपल्या खिशात घातला तर इंग्लंडला वनडे मालिकेत व्हाईटवॉश मिळेल. तत्पूर्वी आयसीसीकडून टीम इंडियाला आनंदाची बातमी मिळाली आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर अूसन 119 रेटिंग झालं आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी असून रेटिंग 113 झाली आहे. तसं पाहिलं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रेटिंगमध्ये बराच फरक आहे. त्यामुळे टीम इंडियाला तिसरा सामना जिंकून आणखी पुढे जाण्याची संधी आहे.

भारताने इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना जिंकला तर रेटिंग 119 वरून थेट 120 वर जाईल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील रेटिंगमधील फरक 1 अंकाने वाढेल. जर भारताने तिसरा सामना गमावला तर रेटिंग 1 अंकाने कमी होईल आणइ 118 होईल. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपू्र्वी टीम इंडिया आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर असणार हे निश्चित आहे. यामुळे टीम इंडियाचं मनोबल वाढेल आणि त्याचा फायदा चॅम्पियन्स ट्रॉफीत होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे फॉर्मेटमध्ये आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली पहिली आयसीसी ट्रॉफी आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण आठ संघ सहभागी आहेत. भारत, बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे संघ एका गटात आहेत. भारताला उपांत्य फेरीसाठी तीन पैकी दोन सामने जिंकणं भाग आहे. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध आणि 3 मार्चला न्यूझीलंडविरुद्ध सामना आहे. भारताचे सर्व सामने हे दुबईत होणार आहेत. भारताने उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरी गाठली तर हे दोन्ही सामने दुबईतच होतील.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.