AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: ‘काही न कळवता काढून टाकलं..’ टीम इंडियातून डावलल्यानंतर खेळाडूच्या भावना

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. टीम इंडियाची घोषणा डिसेंबर महिन्यात करण्यात आली आहे. पण या संघातील दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने चिंता वाढली आहे. दुसरीकडे, संघात निवड न झाल्याने एका खेळाडूने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

T20 World Cup: 'काही न कळवता काढून टाकलं..' टीम इंडियातून डावलल्यानंतर खेळाडूच्या भावना
T20 World Cup: 'काही न कळवता काढून टाकलं..' टीम इंडियातून डावलल्यानंतर खेळाडूच्या भावनाImage Credit source: PTI
| Updated on: Jan 13, 2026 | 8:34 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 7 फेब्रुवारी 2026 पासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा डिसेंबर महिन्यातच करण्यात आली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 15 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. संघाच्या घोषणेनंतर शुबमन गिलला डावलल्याची चर्चा सर्वाधिक रंगली. कारण त्याच्याकडे टी20 संघाचं उपकर्णधारपद होतं. त्यानंतर शुबमन गिलने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. पण आणखी एक खेळाडू असा होता की त्याला न सांगताच संघातून बाहेर काढलं गेलं. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाही तर विकेटकीपर फलंदाज जितेश शर्मा आहे. संघातून डावलल्यानंतर जितेश शर्माने आता कुठे खुलासा केला आहे. जितेश शर्माने सांगितलं की, त्याला संघातून काढलं गेलं आणि घोषणा झाल्याचं मीडियाच्या माध्यमातून कळलं.

डिसेंबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी एकाच संघाची घोषणा केली गेली. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, बीसीसीआय सेक्रेटरी देवजित सैकिया आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संघाची घोषणा करण्यात आली. संघात निवड झाली नाही हे जितेश शर्माला अजिबात माहिती नव्हतं. निवडकर्त्यांनी त्याला याबाबत काहीच कळवलं नव्हतं. क्रिकट्रॅकरला दिलेल्या मुलाखतीत जितेश शर्माने सांगितलं की, ‘संघाची घोषणा होईपर्यंत संघातून बाहे काढलं आहे याची माहिती नव्हती. पत्रकार परिषदेत निवडकर्त्यांनी संघातून डावलण्याचं कारण सांगितलं. मी सहमत होतो आणि ते योग्य कारण आहे.’

प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांनी संघाची घोषणा झाल्यानंतर जितेश शर्माशी संपर्क साधला. त्याबाबत जितेश शर्माने सांगितलं की, ‘यानंतर मी प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांसोबत चर्चा केली होती. मला वाटलं की योग्य कारण आहे. जे काही त्यांना समजवायचं होतं ते मला योग्य रितीने समजलं. मी त्यांच्याशी सहमत आहे.’ जितेश शर्माच्या जागी संघात इशान किशनची एन्ट्री झाली आहे. अजित आगरकरने त्याची निवड करताना सांगितलं की, टीम व्यवस्थापनाला टॉप ऑर्डरमध्ये एक विकेटकीपर फलंदाज हवा होता. त्यामुळे गिलच्या जागी संजू सॅमसनची निवड झाली आहे. तर दुसरा विकेटकीपर म्हणून जितेश शर्माऐवजी इशानला पसंती दिली गेली. जितेश शर्मा फिनिशरची भूमिका बजावतो. पण त्याची जागा रिंकु सिंहचा समावेश केला गेला आहे.

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं