AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं वजन! इशान-तिलक वर्माचं शतक, तर या बॉलर्सने घेतल्या 5 विकेट्स

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पगडा दिसला. वेगवेगळ्या सामन्यात इंडिया ए आणि इंडिया सी संघाने आपलं वर्चस्व दाखवलं आहे. या संघांच्या चांगल्या कामगिरीत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा मोठा वाटा आहे. त्यांनी योग्यवेळी चांगलं प्रदर्शन करून संघाला चांगल्या स्थितीत आणलं आहे.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं वजन! इशान-तिलक वर्माचं शतक, तर या बॉलर्सने घेतल्या 5 विकेट्स
| Updated on: Sep 14, 2024 | 6:13 PM
Share

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ए विरुद्ध इंडिया डी आणि इंडिया सी विरुद्ध इंडिया बी यांच्यात लढत सुरु आहे. या वेगवेगळ्या सामन्यात इंडिया सी आणि इंडिया ए संघ मजबूत स्थितीत आहे. या दोन्ही संघांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचं मुंबई इंडियन्सशी कनेक्शन आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्य ईशान किशन, तिलक वर्मा आणि अंशुल कंबोजने चांगली कामगिरी केली आहे. अनंतपूरमध्ये खेळल्या जामाऱ्या इंडिया ए विरुद्ध इंडिया डी संघात सामना होत आहे. इंडिया संघाने दुसरा डाव 380 धावांवर घोषित केला. तसेच इंडिया डी संघासमोर 488 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंडिया ए संघाची स्थिती मजबूत होण्यामागे तिलक वर्माचं खास योगदान राहिलं आहे. त्याच्या शतकी खेळीमुळे इंडिया ए संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली आहे. तर दुसऱ्या सामन्यात इंडिया सीने आपल्या पहिल्या डावात 525 धावा केल्या. यात इशान किशनच्या शतकाचा समावेश आहे. याच सामन्यात इंडिया सीकडून खेळताना मध्यम गतीने गोलंदाजी करणाऱ्या अंशुल कंबोजने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने इंडिया बी संघाचे पाच गडी बाद केले.

अंशुल कंबोजला मुंबई इंडियन्स संघात अपेक्षित संधी मिळाली नाही. पण इंडिया सी संघाकडून खेळताना आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली. इंडिया सीच्या नारायण जगदीशन, मुशीर खान, सरफराज खान, रिंकु सिंह आणि नीतीश रेड्डीची विकेट काढली. देशांतर्गत आणि आयपीएलमध्ये या खेळाडूंचं मोठं नाव आहे. पण अंशुलच्या गोलंदाजीपुढे सर्व फिके पडले.

तिलक वर्माने 193 चेंडूत 111 धावा केल्या. यात 9 चौकारांचा समावेश होता. तिलक वर्माचं हे पाचवं फर्स्ट क्लास शतक आहे. दरम्यान, इंडिया ए संघ विजयाच्या उंबरठ्यावर असून इंडिया डी संघाला चौथ्या दिवशी 426 धावांचा गरज आहेत. हातात 9 विकेट असून ही धावसंख्या गाठणं कठीण आहे. दुसरीकडे, इंडिया बी आणि इंडिया सी सामना ड्रॉ होणार हे निश्चित झालं आहे. इंडिया ए संघाने विजय मिळवला तर सहा गुण होणार आहेत. दुसरीकडे इंडिया डी संघाच्या खात्यात 0 गुण असेल.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक