AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 : विश्वास तरी कुणावर ठेवावा! पोस्टमास्टरनं 24 कुटुंबियांचे पैसे लावले सट्टेबाजारी

पोस्टरमास्टरवर लोकांनी विश्वास ठेवला. मात्र, हाच विश्वास त्यांना चांगलाच महागात पडलाय.

IPL 2022 : विश्वास तरी कुणावर ठेवावा! पोस्टमास्टरनं 24 कुटुंबियांचे पैसे लावले सट्टेबाजारी
आयपीएलमध्ये सट्टेबाजार?Image Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: May 25, 2022 | 1:32 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये यापूर्वी एक सट्टेबाजीचं (Betting) वृत्त पाकिस्तानमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे समोर आलं होतं. यानंतर आता पुन्हा एक वृत्त हाती आलं असून एका पोस्टमास्टरनं (postmaster) तब्बल एक कोटी रुपये गमावले आहेत. या पोस्टमास्टरनं सट्टेबाजीसाठी तब्बल 24 कुटुंबांची एक कोटी रुपायांची बचत पणाला लावल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे अशा प्रलोभनांना बळी न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. विशेष म्हणजे पोस्टरमास्टरवर लोकांनी विश्वास ठेवला. मात्र, हाच विश्वास त्यांना चांगलाच महागात पडलाय. हा सट्टेबाजार मध्य प्रदेशातील एका पोस्टमास्टरने केला आहे. एक कोटी रुपये पोस्टमास्टरने गमावल्याने तब्बल 24 कुटुंबियांना याचा फटका सहन करावा लागतोय.

नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील सब पोस्ट ऑफिसमध्ये 24 कुटुंबांना मुदत ठेवीचे पैसे जमा करायचे होते. पोलिसांनी सांगतिलेल्या माहितीनुसार, या पोस्टमास्टरने या पैशांचा सट्टा खेळला. बीना सब पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्टर विशाल अहिरवार यांना बीना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांसमोर पोस्टमास्टरने गुन्ह्याची कबुली दिल्याचं सांगण्यात येत आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांना सांगितलं की, पोस्टमास्टरने बनावट एफडी खात्यांसाठी खरे पासबुक जारी केले होते. मागील दोन वर्षांपासून सर्व पैसे आयपीएल क्रिकेट सट्ट्यांमध्ये गुंतवले. बीना जीआरपी स्टेशन प्रभारी अजय धुर्वे यांनी ही माहिती दिली. ही घटना उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांचे लाखे रुपये बुडल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

अनेक कुटुंबांचं  नुकसान

अटक करण्यात आलेल्या सब पोस्टमास्टर विशाल अहिरवारवर आता कलम 420 आयपीसी आणि 408 आयपीसी अंतर्गत आरोपांवरुन त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यातील एका तक्रारदार महिलेनं सांगतिलं की, मी कोरोनामुळे पती आणि सासरे गमावले आहेत. माझ्या पतीने मृत्यूपूर्वी नऊ लाख रुपये जमा केले होते. परंतु मला नुकतेच विशाल अहिरवारच्या फसवणुकीची माहिती मिळाली आहे. यानंतर मी पोस्ट ऑफिसमध्ये गेले. तिथं मला सांगण्यात आलं की मुदत ठेव खाते क्रमांक अस्तित्वात नाही. माझे पती आणि सासरे आता हयात नाहीत. मला आता काय करावं हे समजत नाहीये.

Follow Us
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...