AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पाकिस्तानविरूद्धचा सामना संपण्यापूर्वीच टीम इंडिया उपांत्य फेरीत, झालं असं की…

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर सिक्स फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आहेत. हा सामना संपण्यापूर्वीच टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पाकिस्तानने हा सामना जिंकला तरी काही फरक पडणार नाही.

IND vs PAK : पाकिस्तानविरूद्धचा सामना संपण्यापूर्वीच टीम इंडिया उपांत्य फेरीत, झालं असं की...
पाकिस्तानविरूद्धचा सामना संपण्यापूर्वीच टीम इंडिया उपांत्य फेरीत, झालं असं की...Image Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Feb 01, 2026 | 8:05 PM
Share

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या करो या मरोच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. त्यामुळे भारताला मोठं टार्गेट उभं करणं गरजेचं होतं. पण भारताचा डाव गडगडला. आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यामुळे टीम इंडियावरील दडपण वाढलं. मधल्या फळीत वेदांत त्रिवेदीने डाव सावरला. त्याच्या 68 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाला बळ मिळालं. तर आरएस अंब्रिशने 29, कनिष्क चौहाने 35 आणि खिलान पटेलने 21 धावा केल्या. त्यांच्या खेळीमुळे भारताने 252 धावांपर्यंत मजल मारली. खरं तर हे आव्हान पाकिस्तानसाठी जड होतं. कारण हे आव्हान 50 षटकात पूर्ण करून काही फायदा नव्हता. हा सामना जिंकून नाही तर 33.3 षटकात पूर्ण करणं गरजेच होतं. पाकिस्तानला हे काही जमलं नाही. त्यामुळे पाकिस्तानचं सामना संपण्यापूर्वीच उपांत्य फेरीचं गणित बिघडलं.

पाकिस्तानने विजयी धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. हमजा झहूर आणि समीर मिन्हास यांनी 23 धावांची भागीदारी केली. पण समीर मिन्हास अवघ्या 9 धावा करून बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानवरील दडपण वाढलं. त्यानंतर हमजा झहूर आणि उस्मान खान यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने 80 चेंडूत 65 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. पण ही जोडी फुटला आणि संघाचं टेन्शन दूर झालं. हमजा झहूर 42 धावा करून बाद झाला. त्यानंतर उस्मान खान आणि कर्णधार फरहान युसूफ ही जोडी जमली. उस्मान खानने 77 चेंडूत 5 चौकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. फरहान युसूफ 39 चंडूत 38 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेला अहमद हुसैन काही खास करू शकला नाही. त्याने 6 चेंडूत फक्त 2 धावा केल्या.

पाकिस्तानने 33.3 षटकात 4 गडी गमवून 167 धावा केल्या. खरं तर भारताने विजयासाठी दिलेलं 252 धावांचं आव्हान 33.3 षटकात पूर्ण करायचं होतं. पण पाकिस्तानचा संघ धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना जिंकला तरी काही फरक पडणार नाही. कारण भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं आहे. पाकिस्तानपेक्षा भारताचा नेट रनरेट हा चांगला आहे. त्यामुळे आता विजय मिळवला तरी त्यात काही फरक पडणार नाही. भारताचा नेट रनरेट हा +3.337 आहे, तर पाकिस्तानचा नेट रनरेट हा +1.484 इतका आहे.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.