AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पूरस्कृत दहशतवाद्यांच्या ज्या कुरापत्या सुरु आहेत त्याच्या पार्श्वमीवर टी-ट्वेटी स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान
टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान
| Edited By: Chetan Patil | Updated on: Oct 17, 2021 | 10:16 PM
Share

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पूरस्कृत दहशतवाद्यांच्या ज्या कुरापत्या सुरु आहेत त्याच्या पार्श्वमीवर टी-ट्वेंटी स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही देशांमधील संबंध चांगले नाहीत. तर मग या विषयावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असं गिरिराज सिंह म्हणाले आहेत.

टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान विरोधात नियोजित

टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पहिलाच सामना पाकिस्तान विरोधात खेळवण्यात येणार आहे. हा सामना 24 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधीच हा सामना होऊ नये, अशी मागणी आता देशभरातून होऊ लागली आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार घडवून आणला जातोय. काश्मीरच्या घाट परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वारंवाल लक्ष्य केलं जातंय. त्यांच्यावर हल्ला केला जातोय.

काश्मीरमध्ये गेल्या 10 दिवसांत 13 दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या 10 दिवसांमध्ये भारतीय सैन्याचे अतिरेक्यांसोबत 9 वेळा चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत 12 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत असलं तरी अतिरेक्यांच्या कारवाया काही कमी होताना दिसत नाहीय. पाकिस्तान पूरस्कृत दहशतवादी वारंवार काश्मीरमध्ये घुसखोरी करुन हिंसाचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पाकिस्तानच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

भारत-पाकिस्तान सामना नकोच, चित्रपट निर्माते अशोक पंडीत यांची मागणी

चित्रपट निर्माते आणि भारतीय चित्रपट-दूरचित्रवाणी दिग्दर्शक संघटनेचे अध्यक्ष अशोक पंडीत यांनी देखील भारत-पाकिस्तान सामना होऊ नये, अशी मागणी ट्विटरवर केली आहे. अशोक यांनी त्यांचा व्हिडीओ ट्विट करत ही मागणी केली आहे. यावेळी ते पाकिस्तानवर प्रचंड टीका करतात. पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले होत असताना भारत-पाकिस्तान सामना खेळवलं जाणं हे लज्जास्पद आहे, असं अशोक म्हणाले आहेत.

अशोक पंडीत नेमकं काय म्हणाले?

“पाकिस्तान एक दहशतवादी देश आहे. पाकिस्तान अतिरेक्यांना जन्माला घालतो आणि त्यांना ट्रेन करतो. पाकिस्तान आमच्या कित्येक निष्पापांच आयुष्य उद्ध्वस्त करण्याला, आमच्या भारतीय सैनिकांच्या हत्येला जबाबदार आहे. हा देश संपूर्ण जागासाठी कॅन्सर आजार आहे. आम्ही आजही या क्षणी देखील पाकिस्तानामुळे संघर्ष करतोय. रोज हत्या होत आहेत. आमच्या काश्मीरच्या धर्तीवर रोज आमचे जवान आणि सैनिकांना मारलं जातंय. अशा भयानक परिस्थितीत आमचा देश त्या देशासोबत टी-ट्वेंटी खेळत असेल तर या जगातील सर्वात लज्जास्पद गोष्टी कोणती नसेल. यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे खेळ खेळणं हे आमच्या सैनिकांना अपमान आहे”, असं अशोक पंडीत म्हणतात.

“भारत-पाकिस्तान सामना खेळवणं म्हणजे आमच्या जवानांच्या कुटुंबियांच्या जखमांना आणखी घाव घालण्यासारखी गोष्ट आहे. जे निष्पाप नागरीक रस्त्यांवर मारले गेले आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी ही एक कानशिलात आहे. मी आमच्या क्रिकेट मंडळ, सरकारला विनंती करतो की, हा सामना होऊ देऊ नका. जोपर्यंत परिस्थिती चांगली होत नाही. पाकिस्तानची वागणूक बदलत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचा खेळ खेळला जाऊ शकत नाही. तसेच त्यांच्यासोबत कोणताही व्यापारी करार होऊ शकत नाही. आम्ही एकीकडे मरतोय आणि दुसरीकडे मैदानात त्यांच्यासोबत खेळतोय”, असंदेखील पंडीत म्हणाले आहेत.

हेही वाचा :

एकूण संघ आणि सामने किती, विजेत्या संघाला किती रुपयांचं बक्षीस? जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

बाबर आजमसह 8 खेळाडू, दुबईत पाक खेळाडूंचा डंका, 58 T20 सामन्यांत एकही पराभव नाही, भारतासाठी धोक्याची घंटा!

Follow Us
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय;
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; डॉक्टारांचं पॅनल तयार करणार अन्...
भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर...
भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर कडेकोट बंदोबस्त, पहा व्हिडीओ
जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल; संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut | जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल; जंतर-मंतरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
मोठी घोषणा! उद्या जाहीर होणार कर्जमाफीच्या शेतकऱ्यांची पहिली यादी
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! उद्या जाहीर होणार कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी
दिल्लीत मोठ्या घडमोडी! इकडे मंत्री जे. पी. नड्डांकडून आंदोलकांशी चर्चा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! इकडे मंत्री जे. पी. नड्डांकडून आंदोलकांशी चर्चा, तिकडे विरोधी पक्ष नेते थेट...
मतं घेताना लाज वाटली नाही का? खोतांना आंदोलनकर्त्यांचा थेट सवाल
New Delhi CJP Protest | मतं घेताना लाज वाटली नाही का? सदाभाऊ खोतांना आंदोलनकर्त्यांचा थेट सवाल
सर्वत्र खळबळ! दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत राहुल गांधीचं विधान
त्या' एका विधानाने सर्वत्र खळबळ! दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत राहुल गांधी स्पष्टच म्हणाले
आंदोलक म्हणजे आतंकवादी! खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
Sadabhau Khot | आंदोलक म्हणजे आतंकवादी! सदाभाऊ खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीतील CJP च्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, आंदोलनांसारख्या संवेदनशील...
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय..
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय घडलं?
आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?.

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?

CJP Delhi Protest : दिल्ली पोलिसांना ‘मारो मारो’ म्हणणारा तरूण तर नागपूरचा, सांगितलं आंदोलनात नेमकं काय घडलं?.

CJP Delhi Protest : दिल्ली पोलिसांना ‘मारो मारो’ म्हणणारा तरूण तर नागपूरचा, सांगितलं आंदोलनात नेमकं काय घडलं?

IND vs ZIM: मॅचच्या 48 तासआधी झिम्बाब्वेकडून टीम इंडियाला ओपन चॅलेंज, कॅप्टन सिकंदर रझाने दाखवला माज; Video Viral.

IND vs ZIM: मॅचच्या 48 तासआधी झिम्बाब्वेकडून टीम इंडियाला ओपन चॅलेंज, कॅप्टन सिकंदर रझाने दाखवला माज; Video Viral

Karale Guruji : अपोजिशनला तुम्हाला लाजा शरमा नाहीत का? कॅमेऱ्यासमोर नितेश कराळे गुरुजींनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला मजबूत झापलं.

Karale Guruji : अपोजिशनला तुम्हाला लाजा शरमा नाहीत का? कॅमेऱ्यासमोर नितेश कराळे गुरुजींनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला मजबूत झापलं

Dharmendra Pradhan: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान स्वत: किती शिकले?.

Dharmendra Pradhan: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान स्वत: किती शिकले?

दक्षिणेकडील मोठी अभिनेत्री होणार आई, 20 वर्षांपासून बघत होती वाट.

दक्षिणेकडील मोठी अभिनेत्री होणार आई, 20 वर्षांपासून बघत होती वाट