AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित, विराटच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर ड्रेसिंग रूममध्ये नेमके काय घडले, सूर्यकुमार यादवने सांगितली इनसाईड स्टोरी

Virat Kohli-Rohit Sharma Retirement: विश्वविजेते बनल्यानंतर निवृत्ती घेणे अवघड असते. संघाला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कमतरता जाणवणार आहे. टी-20 विश्वचषकात विराट कोहली अंतिम सामन्यात सामनावीर ठरला.

रोहित, विराटच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर ड्रेसिंग रूममध्ये नेमके काय घडले, सूर्यकुमार यादवने सांगितली इनसाईड स्टोरी
| Updated on: Jul 03, 2024 | 9:18 AM
Share

भारतीय टीमने शनिवार टी-20 विश्वकप जिंकला. त्यानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. देशभरातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु असताना क्रिकेटप्रेमी रस्त्यावर उतरले. त्यांनी जल्लोष सुरु केला. त्याचवेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी क्रिकेटप्रेमींना धक्का दिला. त्यांनी टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली. रोहित-विराटच्या जोडीला हा धक्का होता. दोन्ही खेळाडूंनी यासंदर्भात कधी विचार केला? कधी निर्णय घेतला? सहकाऱ्यांशी चर्चा केली का? यासंदर्भात सूर्यकुमार यादव याने एका वृत्तवाहिनीला सांगितले. ड्रेसिंग रुममध्ये या निर्णयानंतर काय घडले, ते सूर्यकुमार यादव याने सांगितले.

काय घडले ड्रेसिंगरुममध्ये

सूर्यकुमार यादव याने सांगितले की, दोघांची टी-20 मधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यांना आणखी एक मोठी टुर्नामेंट खेळावी, असा आग्रह सहकारी खेळाडूंनी सुरु केला. परंतु रोहित आणि विराट हे दोन्ही खेळाडू आपल्या निर्णयावर ठाम होते.

ड्रेसिंगरुममधील वातावरण बदलले

सूर्यकुमार यादव यांनी सांगितले की, टीम चॅम्पियन बनल्यानंतर ड्रेसिंगरुममध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु विराट आणि रोहित याच्या निर्णयानंतर ड्रेसिंगरुममधील आनंदाचे वातावरण भावनिक झाले. सर्व जण इमोशनल झाले. आता हा निर्णय घेऊ नका. पुढील वर्ल्डकप भारतात होणार आहे. अजून दीड ते दोन वर्ष खेळा. त्यानंतर हा निर्णय घ्या, असे त्यांना सर्व जण सांगू लागले. परंतु दोन्ही खेळाडूंनी आपला निर्णय ठरवला होता. त्यापासून माघार घेण्यास ते तयार नव्हते. दोघांनी आपला निर्णय ठरवला होता.

हा निर्णय घेणे अवघड

सूर्यकुमार यादव म्हणाला, विश्वविजेते बनल्यानंतर निवृत्ती घेणे अवघड असते. संघाला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कमतरता जाणवणार आहे. टी-20 विश्वचषकात विराट कोहली अंतिम सामन्यात सामनावीर ठरला. त्यापूर्वी इतर सर्व सामन्यात तो फलंदाजीत चमक दाखवू शकला नव्हता. परंतु अंतिम सामन्यात विराट कोहलीने केलेल्या खेळीमुळे भारत विजयी झाला.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.