AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीने कसोटी निवृत्तीबाबत अखेर मौन सोडलं, दाढीचं ठरलं कारण!

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर होणार आहे. पण या मालिकेत विराट कोहलीच्या अनुभवाची उणीव भासत आहे. असं असताना कसोटी निवृत्तिबाबतचं मौन अखेर सोडलं आहे.

विराट कोहलीने कसोटी निवृत्तीबाबत अखेर मौन सोडलं, दाढीचं ठरलं कारण!
विराट कोहलीने कसोटी निवृत्तीबाबत अखेर मौन सोडलं, दाढीचं ठरलं कारण! Image Credit source: X
| Updated on: Jul 09, 2025 | 3:27 PM
Share

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच विराट कोहलीने निवृत्तीचा खडा टाकला. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींना धक्का बसला होता. आयपीएल स्पर्धेदरम्यान रोहित शर्मानंतर विराट कोहलीने निवृत्ती घोषणा केली. 12 मे 2025 रोजी त्याने हा धक्कादायक निर्णय घेतला. अवघ्या 36व्या वर्षी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे आश्चर्य वाटणं सहाजिकच होतं. आता विराट कोहलीने कसोटी निवृत्तीबाबत मजेशीर अंदाजात उत्तर दिलं आहे.गौरव कपूरने विराट कोहलीला निवृत्तीबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्याने उत्तर दिलं. गौरवने विचारलं की सर्वजण तुला मैदानात मिस करत आहेत. तेव्हा त्याने उत्तर दिलं की, ‘मी माझी दाढी दोन दिवसांपूर्वीच रंगवली आहे. जेव्हा तुम्हाला प्रत्येक चार दिवसांनी दाढीला रंग करावा लागत असेल, तेव्हा समजून जा की वेळ आली आहे.’विराट कोहलीचं कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करण्याचं स्वप्न होतं. त्या टप्प्याच्या तो अगदी जवळ होता. पण त्यापूर्वीच त्याने निवृत्ती घेतली.

मुलाखतीवेळी विराट कोहलीजवळ रवि शास्त्रीही होते. तेव्हा दोघांनी एकमेकांप्रति सन्मान दाखवला. कोहलीने सांगितलं की, ‘प्रामाणिकपणे सांगायचं तर मी रवि शास्त्रीसोबत काम करत नसतो तर कसोटी जे काही आहे ते शक्य झालं नसतं. आमच्या सर्व काही स्पष्ट आहे, ते शोधणं कठीण आहे. प्रत्येक क्रिकेटपटूला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे. अनेक पत्रकार परिषदेत त्यांनी समोर येत प्रश्नांची उत्तरं दिली. गोष्टी वेगळ्या होऊ शकल्या असत्या आणि माझ्या मनात कायम त्यांच्या प्रती प्रेम आणि सन्मान असेल. कारण माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील ते मोठा भाग आहेत.’

युवराज सिंगने लंडनमध्ये त्याच्या युवीकॅन फाउंडेशन या चॅरिटी संस्थेसाठी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला विराट कोहली उपस्थित होता. विराट कोहली व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, केविन पीटरसन, आशिष नेहरा असे इतर दिग्गज क्रिकेट स्टार या पार्टीला उपस्थित होते. गौरव कपूर यांनी आयोजित केलेल्या या डिनर पार्टी दरम्यान गप्पा मारण्याचे सत्र देखील आयोजित करण्यात आले होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.