भारताला पाचव्या दिवशी ‘या’ खेळाडूची कमी जाणवणार, वसिम जाफरने कोड्यात घेतले नाव

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामन्यातील भारतीय संघाचा दुसरा डाव सध्या 82 षटकांमध्ये 6 बाद 181 धावा अशा स्थितीत आहे. त्यामुळे सामना जिंकवण्याचा सर्व ताण भारतीय गोलंदाजावर असणार हे नक्की.

भारताला पाचव्या दिवशी 'या' खेळाडूची कमी जाणवणार, वसिम जाफरने कोड्यात घेतले नाव
Wasim Jaffer
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 1:26 PM

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs Engalnd) यांच्यात लॉर्ड्स मैदानात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात आज सामन्याचा पाचवा आणि अखेरचा दिवस आहे. सामन्यात दोन्ही संघ चांगल्या स्थितीत आहेत. भारताने सहा विकेट गमावत 181 रन केले आहेत. ज्यामुळे 154 धावांची आघाडी देखील घेतली आहे. ऋषभ पंत आणि इशांत शर्मा  नाबाद आहेत. ज्यामुळे भारत किमान 200 धावांची आघाडी घेण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र अखेर सामना जिंकवण्याची सर्व जबाबदारी ही भारतीय गोलंदाजावरच असणार आहे. यालाच अनुसरुन माजी सलामीवीर वसीम जाफर (Wasim jaffer) याने त्याच्या अंदाजात एका खेळाडूचं नाव इशाऱ्यात घेत त्याची कमी भारतीय संघाला पाचव्या दिवशी जाणवेल असं सूचक ट्विट केलं आहे.

जाफर हा कायम कोड्यात ट्विट करत असतो. आताही त्याने असेच एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्याने ‘एक महत्त्वाची गोष्ट नाहीये’ (main character missing) असं कॅप्शन देत दोन फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये चेंडू मैदानावर पडून मोठ्या प्रमाणात माती उडत आहे. अशाप्रकारे माती ही फिरकीपटूंच्या बोलिंगवरच उडते. त्यामुळे हा इशारा थेट आश्विनसाठी असून पाचव्या दिवशी त्याची गैरहजेरी संघाला अडचणीत आणेल, हेच यातून वसिम सूचवू इच्छित असल्याचे म्हटले जात आहे.

अनेकांना जाणवतेय आश्विनची कमी

दुसरे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा होताच अनेकांनी अश्विनला संघात स्थान न दिल्याच्या निर्णय़ावर टीका केली. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन, भारताचे माजी फलंदाज, वीवीएस. लक्ष्मण आणि आकाश चोप्रा अशा अनेकांनी या गोष्टीवर नाराजी व्यक्त केली. दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्ननेही एक ट्वीट केलं ज्यात त्याने लिहिलं की, ”फिरकीपटू हे कधीही खेळ फिरवू शकतात. मैदानाची स्थिती कशीही असो फिरकीपटूंना खेळवने फायद्याचेच ठरते. केवळ पहिल्या डावाचा विचार करुन तुम्ही संघ निवड करणे चूकीचे आहे. फिरकीपटूचं सामना जिंकवू शकतात.” दरम्यान शेनच्या या ट्विटमुळे विराटने आश्विनला न खेळवण्याचा निर्णय चूकला असल्याचेच जणू त्याने सूचित केले.

हे ही वाचा

IND vs ENG : शर्मा आणि कोहली मैदानाबाहेरुन पंतच्या मदतीला, खराब प्रकाशमानामुळे खेळ थांबवण्याचा सल्ला देतानाचा भन्नाट VIDEO व्हायरल

IND vs ENG : रहाणेचं अर्धशतक, चौथ्या दिवसअखेर भारताची 6 बाद 181 धावांपर्यंत मजल, रिषभ पंतवर मदार

पुजाराच्या बॅटिंगवर सगळीकडून टीकेची झोड, आता दिग्गज खेळाडू म्हणतो, ‘द वॉल’च्या जागी सूर्यकुमारला खेळवा!

(Wasim jaffer hints that team india will miss r ashwin on 5th day at lords test by his tweet)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.