AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : रहाणेचं अर्धशतक, चौथ्या दिवसअखेर भारताची 6 बाद 181 धावांपर्यंत मजल, रिषभ पंतवर मदार

दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 82 षटकांमध्ये 6 बाद 181 धावा जमवल्या आहेत. त्यामुळे भारताला आतापर्यंत 154 धावांची आघाडी मिळाली आहे.

IND vs ENG : रहाणेचं अर्धशतक, चौथ्या दिवसअखेर भारताची 6 बाद 181 धावांपर्यंत मजल, रिषभ पंतवर मदार
| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 11:36 PM
Share

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर आता दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु असून आज सामन्याचा चौथा दिवस होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 364 धावा जमवल्या तर त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंडने काल तिसऱ्या सर्वबाद 391 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे इंग्लंडला या डावात 27 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 82 षटकांमध्ये 6 बाद 181 धावा जमवल्या आहेत. त्यामुळे भारताला आतापर्यंत 154 धावांची आघाडी मिळाली आहे. (IND vs ENG: Ajinkya Rahane fifty, India 181 for 6 at the end of day 4 of Lords Test)

दुसऱ्या डावात भारताची अत्यंत खराब सुरुवात झाली. पहिल्या डावात शतक ठोकणारा सलामीवीर के. एल. राहुल दुसऱ्या डावात 5 धावा करुन बाद झाला. पाठोपाठ 21 धावा करुन रोहित शर्मादेखील माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली 20 धावांवर असताना सॅम करनची शिकार ठरला. भारतीय संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेल्यानंतर भारताचा डाव भरवशाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने सावरला. या जोडीने तब्बल 297 चेंडूत शतकी भागीदारी रचून भारताचं या सामन्यातील आव्हान जिवंत ठेवलं. ही जोडी आजचा पूर्ण दिवस नाबाद राहील असं वाटत असताना मार्क वूडने एका उत्कृष्ट चेंडूवर चेतेश्वर पुजाराला बाद केलं. त्याने 45 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर काही वेळाने रहाणेदेखील मोईन अलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. रहाणेने मोठ्या कालावधीनंतर अर्धशतक फटकावलं. त्याने 146 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. त्यानंतर रवींद्र जाडेजादेखील 3 धावा करुन बाद झाला. दिवसअखेर भारताने 82 षटकांमध्ये 181 धावांपर्यंत मजल मारली.

इंग्लंडकडून मार्क वूडने 3 तर मोईन अलीने 2 विकेट घेतल्या. तसेच सॅम करनने विराट कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. दरम्यान, अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा खेळ अर्धा तास आधीच थांबवण्यात आला. रिषभ पंत 14 आणि इशांत शर्मा 4 धावांवर नाबाद आहेत.

इंग्लंडचा पहिला डाव

दरम्यान, काल तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 391 धावांपर्यंत मजल मारली होती. इंग्लंडकडून या डावात कर्णधार रुटने सर्वाधिक 180 धावांचं योगदान दिलं. तो नाबाद राहिला. त्याला जॉनी बेअरस्टोने चांगली साथ दिली. बेअरस्टोने 57 धावांची खेळी केली. तर सलामीवीर रॉनी बर्न्स याने काल 49 धावांची खेळी करत इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली होती. आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजीचा चांगलाच कस लागला. रुटव्यतिरिक्त कोणत्याही इंग्लिश फलंदाजाला भारतीय गोलंदाजांनी फार वेळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. मात्र आज पुन्हा एकदा रुटने भारतीय गोलंदाजीची पिसं काढली. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर इशांत शर्माने 3 आणि मोहम्मद शमीने 2 बळी घेतले.

भारताचा पहिला डाव

तत्पूर्वी लॉर्ड्स कसोटीत नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याचा निर्णय भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी चुकीचा ठरवला. रोहितने आक्रमक फटकेबाजी करत 83 धावांची खेळी केली, तर राहुलने त्याला साथ दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पुजाराला फारसे काही करता आले नाही आणि तो स्वस्तात बाद झाला. पुजारा बाद झाल्यानंतर राहुलने कोहलीसह भारतीय डावाची धुरा सांभाळली आणि या दरम्यान राहुलने लॉर्ड्सवर आपले पहिले शतक झळकावले. विराट कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने 42 धावांचे योगदान दिले. त्यानंतर रवींद्र जाडेजाने 40 धावांचे योगदान दिले. तर रिषभ पंतने 37 धावा जमवल्या. 129 धावांची खेळी करुन राहुल बाद झाला. राहुल-रोहित, कोहली आणि जाडेजाने दिलेल्या धावांच्या योगदानामुळे भारताला पहिल्या डावात 364 धावा उभारता आल्या.

इतर बातम्या

इंग्लिश प्रेक्षकांनी राहुलच्या अंगावर बाटलीची झाकणं फेकली, संतापलेल्या विराट कोहलीकडून जशास तसे उत्तर

टीम इंडियाच्या सुपरस्टार खेळाडूची निवृत्ती, स्वातंत्र्यदिनी क्रिकेट सोडण्याची घोषणा, आजही काळजात धस्स होतं!

Ind vs Eng : दिनेश कार्तिक म्हणाला, ‘वाढीव दिसताय राव’, आता मोहम्मद सिराजकडून ‘अपना स्टाईल’मध्ये उत्तर!

(IND vs ENG: Ajinkya Rahane fifty, India 181 for 6 at the end of day 4 of Lords Test)

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.