AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला आशिया कप 2025 ट्रॉफी कधी आणि कशी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण घडामोड

आशिया कप स्पर्धा उलटून 20 दिवसांहून अधिकचा काळ लोटला आहे. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. मात्र टीम इंडियाला ट्रॉफी काही मिळाली नाही. मोहसिन नक्वी ट्रॉफी घेऊन पळून गेले. आता त्या ट्रॉफीबाबत एक अपडेट समोर आली आहे.

भारताला आशिया कप 2025 ट्रॉफी कधी आणि कशी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण घडामोड
भारताला आशिया कप 2025 ट्रॉफी कधी आणि कशी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण घडामोडImage Credit source: Francois Nel/Getty Images
| Updated on: Oct 17, 2025 | 9:37 PM
Share

आशिया कप स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली. एकही सामना न गमावता जेतेपदावर नाव कोरलं. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला तीन वेळा पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात तर विजयाचा घास त्यांच्या तोंडून खेचून आणला. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानशी जवळीक साधेल असा कोणताच निर्णय घेतला नाही. नाणेफेक ते सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. तर अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या नक्वीच्या हातून ट्रॉफी घेण्यासही नकार दिला. पण नक्वीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि ट्रॉफी घेऊन पसार झाला. त्यानंतर बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या चाहत्यांचा संताप झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना 28 सप्टेंबरला झाला होता. ही स्पर्धा संपून आता 20 दिवसांचा काळ लोटला आहे. पण अजूनही भारतीय संघाला ट्रॉफी मिळाली नाही.

रिपोर्टनुसार, आशियाई क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वीने ट्रॉफी एसीसी कार्यालयात ठेवली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, मोहसिन नक्वीने या ट्रॉफीला कोणालाही हात लावू देऊ नये असे स्पष्ट आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तसेच परवानगीशिवाय कोणीही ही ट्रॉफी कार्यालयाबाहेर नेता कामा नये असे आदेश दिलेत. मग आता टीम इंडियाला ट्रॉफी कधी मिळणार? असा प्रश्न आहे. बीसीसीआय ट्रॉफी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र हा सर्व पेच आता एक बैठकीतच सुटणार असं दिसत आहे. या बैठकीनंतर टीम इंडियाच्या ट्रॉफीचा निकाल लागणार आहे.

28 सप्टेंबरच्या प्रकारानंतर लगेचच दोन दिवसांनी म्हणजेच 30 सप्टेंबरला एसीसीची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली होती. यात बैठकीत ट्रॉफीचा मुद्दा उचलला गेला होता. तेव्हा एसीसीमधील पाच कसोटी खेळणारे देश म्हणजेच भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान याबाबत ठरवतील असं सांगितलं गेलं. ही बैठक आता पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला होणार असं सांगण्यात येत आहे. मोहसिन नक्वी या बैठकीला उपस्थित राहणार की नाही याबाबत अस्पष्टता आहे. पण या बैठकीतच ट्रॉफीबाबत अंतिम निकाल लागणार आहे. दुसरीकडे, बीसीसीआयने ट्रॉफीबाबत अधिकृत असं काही सांगितलेलं नाही. त्यामुळे या बैठकीतच काय ते ठरेल असं स्पष्ट दिसत आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक