AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : उपांत्य फेरीत टीम इंडियाचं विजयाचं श्रेय कोणाला? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा कठीण पेपर सोडवला. या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने 265 धावांचं कठीण आव्हान दिलं होतं. पण भारताने 6 गडी गमवून हे आव्हान गाठलं. या सामन्यात विजयाचं श्रेय कोणाला? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं की..

IND vs AUS : उपांत्य फेरीत टीम इंडियाचं विजयाचं श्रेय कोणाला? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं
Image Credit source: BCCI
| Updated on: Mar 04, 2025 | 10:30 PM
Share

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीपर्यंतचे सर्व सामने भारताने जिंकले आहेत. आता एक सामना जिंकताच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदावर टीम इंडिया तिसऱ्यांदा नाव कोरणार आहे. भारताने एकदा श्रीलंकेसोबत चॅम्पियन्स ट्रॉफी शेअर केली आहे. तर 2013 साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2017 साली जेतेपदाचं स्वप्न भंगलं होते. तेव्हा पाकिस्तानने 180 धावांनी भारताचा पराभव केला होताय या सर्वांचा हिशेब भारताने या स्पर्धेत चुकता केला आहे. आता भारताचा अंतिम फेरीचा सामना दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे. हा सामना 9 मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे. दरम्यान, उपांत्य फेरीत भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 4 गडी राखून पराभूत केलं. हा विजय वाटतो तितका सोपा नाही. कारण ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणणं काही सोपं काम नाही. पण भारताची रणनिती कामी आली. ट्रेव्हिस हेडला बाद करण्यात वरुण चक्रवर्तीला यश आलं. तर स्टीव्ह स्मिथ आणि एलेक्स कॅरेची विकेट मिळाल्याने धावांना ब्रेक बसला. त्याचबरोबर फलंदाजीत विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने डाव सावरला. या विजयाचं श्रेय कोणाला देणार यावर रोहित शर्माने स्पष्ट काय ते सांगून टाकलं.

‘या विजयाचं श्रेय सर्वांनाच जातं. आम्ही संघ म्हणून ही कामगिरी केली आहे. त्याने (विराट कोहलीने) भारतासाठी बरीच वर्षे हे काम केलं आहे. आम्ही फलंदाजी शांतपणे आपलं काम करत होतो. शेवटच्या टप्प्यात हार्दिक पांड्याने मोठी फटकेबाजी करून प्रेशर हलकं केलं.जेव्हा तुम्ही अंतिम फेरीत पोहोचता तेव्हा तुम्हाला सर्व खेळाडू फॉर्मात हवे असतात. सर्वांनी आतापर्यंत झालेल्या सामन्यात प्रभाव टाकला आहे. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही आता अंतिम फेरीबाबत जास्त काही विचार करत नाही. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे दोन्ही संघ तगडे आहेत.’, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.

भारताचा अंतिम फेरीचा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे. या दोन्ही संघात उपांत्य फेरीचा सामना 5 मार्चला होणार आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये हे दोन्ही संघ भिडणार आहेत. विजयानंतर एक संघ दुबईला अंतिम फेरीचा सामना खेळण्यासाठी येणार आहे. भारताने न्यूझीलंडला साखळी फेरीत पराभूत केलं आहे. तर आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं आहे. त्यामुळे अंतिम फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Follow Us
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून...
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून केली पोलखोल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर