AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : उपांत्य फेरीत टीम इंडियाचं विजयाचं श्रेय कोणाला? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा कठीण पेपर सोडवला. या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने 265 धावांचं कठीण आव्हान दिलं होतं. पण भारताने 6 गडी गमवून हे आव्हान गाठलं. या सामन्यात विजयाचं श्रेय कोणाला? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं की..

IND vs AUS : उपांत्य फेरीत टीम इंडियाचं विजयाचं श्रेय कोणाला? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं
Image Credit source: BCCI
| Updated on: Mar 04, 2025 | 10:30 PM
Share

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीपर्यंतचे सर्व सामने भारताने जिंकले आहेत. आता एक सामना जिंकताच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदावर टीम इंडिया तिसऱ्यांदा नाव कोरणार आहे. भारताने एकदा श्रीलंकेसोबत चॅम्पियन्स ट्रॉफी शेअर केली आहे. तर 2013 साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2017 साली जेतेपदाचं स्वप्न भंगलं होते. तेव्हा पाकिस्तानने 180 धावांनी भारताचा पराभव केला होताय या सर्वांचा हिशेब भारताने या स्पर्धेत चुकता केला आहे. आता भारताचा अंतिम फेरीचा सामना दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे. हा सामना 9 मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे. दरम्यान, उपांत्य फेरीत भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 4 गडी राखून पराभूत केलं. हा विजय वाटतो तितका सोपा नाही. कारण ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणणं काही सोपं काम नाही. पण भारताची रणनिती कामी आली. ट्रेव्हिस हेडला बाद करण्यात वरुण चक्रवर्तीला यश आलं. तर स्टीव्ह स्मिथ आणि एलेक्स कॅरेची विकेट मिळाल्याने धावांना ब्रेक बसला. त्याचबरोबर फलंदाजीत विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने डाव सावरला. या विजयाचं श्रेय कोणाला देणार यावर रोहित शर्माने स्पष्ट काय ते सांगून टाकलं.

‘या विजयाचं श्रेय सर्वांनाच जातं. आम्ही संघ म्हणून ही कामगिरी केली आहे. त्याने (विराट कोहलीने) भारतासाठी बरीच वर्षे हे काम केलं आहे. आम्ही फलंदाजी शांतपणे आपलं काम करत होतो. शेवटच्या टप्प्यात हार्दिक पांड्याने मोठी फटकेबाजी करून प्रेशर हलकं केलं.जेव्हा तुम्ही अंतिम फेरीत पोहोचता तेव्हा तुम्हाला सर्व खेळाडू फॉर्मात हवे असतात. सर्वांनी आतापर्यंत झालेल्या सामन्यात प्रभाव टाकला आहे. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही आता अंतिम फेरीबाबत जास्त काही विचार करत नाही. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे दोन्ही संघ तगडे आहेत.’, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.

भारताचा अंतिम फेरीचा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे. या दोन्ही संघात उपांत्य फेरीचा सामना 5 मार्चला होणार आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये हे दोन्ही संघ भिडणार आहेत. विजयानंतर एक संघ दुबईला अंतिम फेरीचा सामना खेळण्यासाठी येणार आहे. भारताने न्यूझीलंडला साखळी फेरीत पराभूत केलं आहे. तर आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं आहे. त्यामुळे अंतिम फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Follow Us
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी