बॉम्ब डिफ्यूज करणारी ही विशेष फोर्स नेमकी काय करते? वाचा सविस्तर
जेव्हा कुठे बॉम्ब सापडल्याची माहिती मिळते, तेव्हा सर्वप्रथम एनएसजी म्हणजेच 'ब्लॅक कॅट' कमांडो फोर्सला बोलावलं जातं. पण हे कमांडो नक्की काय करतात, त्यांना का बोलावलं जातं हे तुम्हाला माहीत नसेल, तर ही माहिती नक्की वाचा पुढच्या वेळेस नक्की उपयोगी ठरेल!

कुठेही बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यावर लोकांमध्ये घबराट पसरते. अशा वेळी सर्वप्रथम पोलीस घटनास्थळी पोहोचतात, आणि नंतर या धोकादायक परिस्थितीला हाताळण्यासाठी ज्यांना बोलावलं जातं, ते असतात भारताचे खास ‘एनएसजी कमांडो’. या कमांडोंना ‘ब्लॅक कॅट्स’ म्हणूनही ओळखलं जातं. ते अत्यंत प्रशिक्षित आणि अत्याधुनिक शस्त्रसज्ज असतात.
बॉम्बची बातमी मिळाल्यावर सर्वात आधी काय करतात ?
जेव्हा कुठे बॉम्ब सापडल्याची माहिती मिळते, तेव्हा स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचून परिसर रिकामा करतात आणि नंतर एनएसजी नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स या विशेष कमांडो फोर्सला बोलावलं जातं. हे कमांडो बॉम्ब निष्क्रिय करणे (बॉम्ब डिफ्यूज करणे), शोध मोहीम राबवणे, आणि आवश्यक असल्यास दहशतवाद्यांशी लढणे यामध्ये तज्ज्ञ असतात.
एनएसजी म्हणजे कोण?
एनएसजी ही भारताची सर्वोच्च कमांडो फोर्स आहे, जी गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असते. त्यांची स्थापना आतंकवादविरोधी मोहिमा, हायजॅकिंग नियंत्रण, आणि बॉम्ब निरोधक ऑपरेशन्स यासाठी विशेषतः करण्यात आली आहे. एनएसजीमध्ये निवड होण्यासाठी फक्त भारतीय सैन्य, पोलीस आणि निमलष्करी दलांमधून सर्वोत्तम आणि अत्युच्च क्षमतेचे जवान निवडले जातात.
या कमांडोंना विशेष प्रशिक्षण दिलं जातं त्यामध्ये शारिरीक क्षमता, शस्त्र हाताळणी, बॉम्ब डिस्पोजल, शहरात आणि जंगलात लढण्याचं कौशल्य आणि अनेक गुप्त ऑपरेशन्सचा समावेश असतो.
ब्लॅक कॅट्स कशासाठी ओळखले जातात?
एनएसजी कमांडो त्यांच्या काळ्या युनिफॉर्ममुळे ‘ब्लॅक कॅट्स’ म्हणून ओळखले जातात. त्यांचं नाव ऐकताच दहशतवाद्यांच्या मनात भीती निर्माण होते. यांचं कार्य फक्त बॉम्ब डिफ्यूज करणेच नाही, तर वीआयपी सुरक्षा, बंधक स्थिती हाताळणे, आणि दहशतवादी कारवायांना उत्तर देणं यात सुद्धा ते अव्वल आहेत.
इतर कमांडो फोर्ससुद्धा आहेत, पण… भारतीय सैन्यात मार्कोस (नेव्ही कमांडो), गर्व्ह (Air Force’s Garud Commandos) आणि पॅरा स्पेशल फोर्स (Army) यांसारख्या इतर अत्यंत सक्षम फोर्सेस देखील आहेत. मात्र जेव्हा विषय बॉम्बशी संबंधित असतो, तेव्हा एनएसजीलाच सर्वप्रथम प्राधान्य दिलं जातं.
त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला कुठे ‘ब्लॅक कॅट’ कमांडोंबद्दल काही ऐकायला मिळालं, तर समजा की त्या टीमचा उद्देश फक्त संरक्षण नाही, तर धोक्याला सामोरं जाऊन देश वाचवणं हा आहे!
