AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs PBKS IPL 2022 Head to Head: दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यात कोणाचं पारडं जड? जाणून घ्या आतापर्यंतची आकडेवारी

आयपीएल-2022 (IPL 2022) मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. हा सामना कोरोनाच्या सावटाखाली आहे आणि त्यामुळे या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे.

DC vs PBKS IPL 2022 Head to Head: दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यात कोणाचं पारडं जड? जाणून घ्या आतापर्यंतची आकडेवारी
DC vs PBKS IPL 2022 Head to Head StatsImage Credit source: IPL
| Updated on: Apr 19, 2022 | 6:14 PM
Share

मुंबई : आयपीएल-2022 (IPL 2022) मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. हा सामना कोरोनाच्या सावटाखाली आहे आणि त्यामुळे या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, यापूर्वी हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार होता, परंतु आता हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कोरोना संसर्ग आणखी पसरू नये म्हणून बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या कॅम्पमध्ये पाच कोविड प्रकरणे आढळल्यानंतर बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला. दिल्ली कॅपिटल्सला कोविडची चिंता बाजूला सारून या सामन्यात चांगली कामगिरी करायची आहे आणि या हंगामातील तिसरा विजय त्यांच्या खात्यात टाकायचा आहे.

दिल्लीने आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यापैकी दोन जिंकले आहेत, तर तीन सामन्यांमध्ये दिल्लीने पराभव पत्करले आहेत. शेवटच्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला होता. गुणतालिकेत हा संघ आठव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, पंजाबच्या कामगिरीकडे पाहिल्यास या संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. हा संघ त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभूत झाला आहे. सनरायझर्स हैदराबादने पंजाबचा पराभव केला होता. पॉइंट्स टेबलमध्ये पंजाब दिल्लीच्या एका स्थान पुढे आहे.

हेड टू हेड आकडेवारी

या दोन संघांमधील आतापर्यंतच्या हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही संघांनी आतापर्यंत 28 सामने खेळले आहेत. इतक्या सामन्यांपैकी पंजाबच्या वाट्याला 15 सामन्यात विजय मिळाला आहे, तर दिल्लीचा संघ 13 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. दुसरीकडे, सध्याचा फॉर्म बघितला तर पंजाबचा संघ दिल्लीपेक्षा चांगल्या लयीत दिसत आहे.

मागील 5 सामन्यांची स्थिती

या दोन संघांमधील गेल्या पाच सामन्यांची आकडेवारी पाहिली तर दिल्लीचा संघ खूप पुढे आहे. गेल्या पाच सामन्यांमध्ये दिल्लीने चार तर पंजाबने केवळ एकच विजय मिळवला आहे. गेल्या वर्षी 2 मे आणि 18 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला होता. 20 ऑक्टोबर 2020 रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्यात पंजाबने विजय मिळवला होता. दिल्लीने 20 सप्टेंबर 2020 रोजी पंजाबचा पराभव केला होता. त्याचवेळी 20 एप्रिल 2019 रोजी झालेल्या सामन्यातदेखील दिल्लीने विजय नोंदवला होता.

इतर बातम्या

IPL 2022 Orange Cap : जॉस बटलर 272 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर,पर्पल कॅप युझवेंद्र चहलकडे कायम

RR vs KKR IPL Match Result: अरेरे, KKR चा निसटता पराभव, चहलची गेम चेंजिंग ओव्हर

RR vs KKR IPL 2022: दोघांनी मिळून घेतली एक कॅच, पहा बाउंड्रीवरील अफलातून झेल VIDEO, तुम्ही सुद्धा म्हणाल जबरदस्त

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.