AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली दोन वर्षात शतकांचं शतक ठोकणार? किती सामने आहेत ते जाणून घ्या

विराट कोहलीने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळतो. असं असताना सलग शतक झळकावत त्याने फॉर्म सिद्ध केला आहे. त्यामुळे शतकांचं शतक ठोकणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

विराट कोहली दोन वर्षात शतकांचं शतक ठोकणार? किती सामने आहेत ते जाणून घ्या
विराट कोहली दोन वर्षात शतकांचं शतक ठोकणार? किती सामने आहेत ते जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Dec 04, 2025 | 9:53 PM
Share

विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव… अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केले आहे. अजूनही त्याच्यात धावांची भूक आहे. कसोटी आणि टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने वनडे फॉर्मेटवर लक्ष केंद्रीत केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यांदा मैदानात उतरला. पण सलग दोन वेळा त्याला खातंही खोलता आलं नाही. पण तिसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी करत टायगर अभी जिंदा है हे दाखवून दिलं. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने आपला खरं रूप दाखवलं. सलग दोन वनडे सामन्यात शतक ठोकत फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. वनडे कारकि‍र्दीत त्याने 53 वं शतक ठोकलं. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 84वं शतक ठोकलं आहे. आता तिसऱ्या वनडे सामन्यात काय करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे, क्रीडाप्रेमींमध्ये आणखी एक चर्चा रंगली आहे. विराट कोहली शतकांचं शतक ठोकणार का?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. आता या विक्रमाच्या मागे विराट कोहली लागल्याचं त्याचे चाहते सांगत आहेत. विराट कोहलीच्या दोन इनिंग पाहिल्यानंतर तो आरामात 101 शतकं ठोकू शकतो असा दावाही त्याच्या चाहत्यांनी केला आहे. आता प्रश्न असा आहे की, विराट कोहली 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत किती सामने खेळणार? शतकांचं शतक ठोकण्यासाठी विराटला 16 शतकांची गरज आहे आणि मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम मोडण्यासाठी 17 शतकांची आवश्यकता आहे.

टीम इंडिया वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत एकूण 19 सामने खेळण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक सामना तर विराट कोहली 6 डिसेंबरला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. जर टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवली तर एकूण 11 सामने खेळेल. अशा स्थितीत विराट कोहलीला एकूण 30 वनडे सामने खेळण्याची संधी मिळू शकते. पण या 30 सामन्यात 17 शतकं ठोकणं खूपच कठीण आहे. त्यामुळे विराट किती शतकांपर्यंत मजल मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला.