AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली दोन वर्षात शतकांचं शतक ठोकणार? किती सामने आहेत ते जाणून घ्या

विराट कोहलीने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळतो. असं असताना सलग शतक झळकावत त्याने फॉर्म सिद्ध केला आहे. त्यामुळे शतकांचं शतक ठोकणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

विराट कोहली दोन वर्षात शतकांचं शतक ठोकणार? किती सामने आहेत ते जाणून घ्या
विराट कोहली दोन वर्षात शतकांचं शतक ठोकणार? किती सामने आहेत ते जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Dec 04, 2025 | 9:53 PM
Share

विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव… अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केले आहे. अजूनही त्याच्यात धावांची भूक आहे. कसोटी आणि टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने वनडे फॉर्मेटवर लक्ष केंद्रीत केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यांदा मैदानात उतरला. पण सलग दोन वेळा त्याला खातंही खोलता आलं नाही. पण तिसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी करत टायगर अभी जिंदा है हे दाखवून दिलं. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने आपला खरं रूप दाखवलं. सलग दोन वनडे सामन्यात शतक ठोकत फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. वनडे कारकि‍र्दीत त्याने 53 वं शतक ठोकलं. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 84वं शतक ठोकलं आहे. आता तिसऱ्या वनडे सामन्यात काय करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे, क्रीडाप्रेमींमध्ये आणखी एक चर्चा रंगली आहे. विराट कोहली शतकांचं शतक ठोकणार का?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. आता या विक्रमाच्या मागे विराट कोहली लागल्याचं त्याचे चाहते सांगत आहेत. विराट कोहलीच्या दोन इनिंग पाहिल्यानंतर तो आरामात 101 शतकं ठोकू शकतो असा दावाही त्याच्या चाहत्यांनी केला आहे. आता प्रश्न असा आहे की, विराट कोहली 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत किती सामने खेळणार? शतकांचं शतक ठोकण्यासाठी विराटला 16 शतकांची गरज आहे आणि मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम मोडण्यासाठी 17 शतकांची आवश्यकता आहे.

टीम इंडिया वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत एकूण 19 सामने खेळण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक सामना तर विराट कोहली 6 डिसेंबरला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. जर टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवली तर एकूण 11 सामने खेळेल. अशा स्थितीत विराट कोहलीला एकूण 30 वनडे सामने खेळण्याची संधी मिळू शकते. पण या 30 सामन्यात 17 शतकं ठोकणं खूपच कठीण आहे. त्यामुळे विराट किती शतकांपर्यंत मजल मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
राष्ट्रावदीतील हालचाली वाढल्या; दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीमागे नेमकं कारण काय?
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर; लाखो शेतकऱ्यांना फायदा
जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं; जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर...
Devendra Fadnavis | जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं!; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर फडणवीसांचं मोठं विधान
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी,
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी, रक्तदान शिबिराचे आयोजन
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग