AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens World Cup: ऑस्ट्रेलिया की दक्षिण आफ्रिका! उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणाशी? जाणून घ्या गणित

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडला 53 धावांनी पराभूत केलं आणि उपांत्य फेरी गाठली. आता भारताचा उपांत्य फेरीत कोणाशी सामना होणार याबाबत उत्सुकता आहे. ऑस्ट्रेलिया की दक्षिण अफ्रिका याबाबत पेच आहे.

Womens World Cup: ऑस्ट्रेलिया की दक्षिण आफ्रिका! उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणाशी? जाणून घ्या गणित
Womens World Cup: ऑस्ट्रेलिया की दक्षिण आफ्रिका! उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणाशी? जाणून घ्या गणितImage Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Oct 24, 2025 | 7:47 PM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने जिंकून भारताने चांगली सुरुवात केली होती. पण त्यानंतर सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने पराभूत केलं होतं. सलग तीन सामन्यात पराभव झाल्याने उपांत्य फेरीचं गणित गडबडलं होतं. पण भारताने न्यूझीलंडला 53 धावांनी पराभूत केलं आणि उपांत्य फेरीत जागा पक्की केली. उपांत्य फेरीत भारतासोबत ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या संघांनी धडक मारली आहे. या तिन्ही संघांनी साखळी फेरीत भारताला पराभूत केलं आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. उपांत्य फेरीत कोणासोबत सामना करावा लागतो याची गणित बांधत आहेत. भारताचा उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिकेशी होऊ शकतो. कारण भारताने बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तरी चौथ्या स्थानात काही फरक पडणार नाही.

दुसरीकडे, इंग्लंडने न्यूझीलंडविरूद्धचा शेवटचा सामना जिंकला तर जास्तीत जास्त दुसऱ्या स्थानावर मजल मारू शकतात. इंग्लंडचे 9 गुण असून शेवटचा सामना जिंकला तर 11 गुण होतील. पण ऑस्ट्रेलियाचे आताच 11 गुण, तर दक्षिण अफ्रिकेचे 10 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाला 13 गुण तर दक्षिण अफ्रिकेला 12 गुण करण्याची संधी आहे. त्यामुळे भारताचा सामना टॉपला असलेल्या संघाशी होणार आहे. या स्थानावर ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिका विराजमान होऊ शकते. या दोन पैकी एका संघाशी भारताचा सामना होईल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात साखळी फेरीतील शेवटचा सामना होत आहे. या सामन्यातील विजयी संघ भारताची भिडेल.

उपांत्य फेरीचा सामना खेळण्यापूर्वी भारताला चाचपणी करण्याची एक संधी साखळी फेरीत असणार आहे. भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला काही गोष्टी सुधारण्याची संधी मिळणार आहे. खासकरून गोलंदाजीत भारताला काम करावं लागणार आहे. कारण या स्पर्धेत भारताची गोलंदाजी फार काही प्रभावी दिसली नाही. दुसरीकडे, उपांत्य फेरीतील पहिला सामना 29 सप्टेंबरला गुवाहाटी क्रिकेट स्टेडियमवर, तर दुसरा सामना 30 सप्टेंबरला डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळला जाईल.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!