AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | विराट कोहलीच्या शतकी खेळीत पंचांचा मोलाचा वाटा, ऐन मोक्याच्या क्षणी घेतला असा निर्णय

Virat Kohli | वनडे वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहली चांगलाच फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर आता बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकलं. पण यात पंचांचाही मोलाचा वाटा होता अशी चर्चा रंगली आहे.

Video | विराट कोहलीच्या शतकी खेळीत पंचांचा मोलाचा वाटा, ऐन मोक्याच्या क्षणी घेतला असा निर्णय
Video| विराट कोहली याचं शतक व्हावं असं पंचांना देखील वाटतं होतं! 'त्या' निर्णयानंतर ड्रेसिंग रुममध्ये हास्यकल्लोळ
| Updated on: Oct 19, 2023 | 10:57 PM
Share

मुंबई : विराट कोहली हा भारताच्या भात्यातील प्रमुख अस्र आहे. फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गरज पडली तेव्हा गोलंदाजीही केली. विराट कोहली याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात संघाची बिकट स्थिती असताना केएल राहुलसोबत महत्त्वाची खेळी केली. चौथ्या गड्यासाठी 165 धावांची भागीदारी केली. तसेच 116 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 85 धावा केल्या. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यातही विराट कोहली याने नाबाद 55 धावा केल्या. तर बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात 97 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली. त्यामुळे विराट कोहली याचा फॉर्म टीम इंडियासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. पण बांगलादेश विरुद्धच्या शतकाची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. शतकी खेळी करण्यासाठी खटाटोप पाहून नेटकऱ्यांनी टीकाही केली आहे. पण सर्वात मोठी गंमत म्हणजे विराटचं शतक व्हावं म्हणून पंचांनीही खारीचा वाटा उचलला असंच म्हणावं लागेल.

बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमवून 256 धावा केल्या आणि विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलं. भारतानं हे आव्हान गाठण्यासाठी 42 षटकं घेतली. 41 षटकात भारताने 3 गडी बाद 255 धावा झाल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी अवघ्या दोन धावांची आवश्यकता होती. नसुम अहमद याच्याकडे 42वं षटक सोपवण्यात आलं. विराट कोहलीच्या 94 चेंडूत 97 धावा झाल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी 2 आणि शतकासाठी 3 धावा अशी स्थिती होती.

नसुम अहमदने पहिलाच चेंडू लेग साइडला टाकला. खरं तर हा चेंडू वाइड होता. पण पंचांनी हा चेंडू वाइड दिला नाही. त्यामुळे ड्रेसिंग रुममधील भारतीय खेळाडूंनाही हासू आवरलं नाही. समालोचन करणाऱ्या मोहम्मद कैफ आणि इरफान पठाण यांनीही गंमतीगंमतीत बरंच काही बोलून गेले. पंचांनी एक कटाक्ष विराट कोहलीकडे टाकला आणि गाळातल्या गाळात हसले. हा चेंडू निर्धाव गेला. हा चेंडू वाइड दिला असता तर विजयासाठी अवघी एक धाव हवी असती. तसेच शतक करणं कठीणही होऊ शकलं असतं.

नसुम अहमद याचा दुसरा चेंडूही निर्धाव गेला. पण विराट कोहली याने तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकला आणि संघाच्या विजयासह नाबाद 103 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना विराट कोहली याचं तिसरं शतक आहे.

जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.
आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत
आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत.
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न.