AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | विराट कोहलीच्या शतकी खेळीत पंचांचा मोलाचा वाटा, ऐन मोक्याच्या क्षणी घेतला असा निर्णय

Virat Kohli | वनडे वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहली चांगलाच फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर आता बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकलं. पण यात पंचांचाही मोलाचा वाटा होता अशी चर्चा रंगली आहे.

Video | विराट कोहलीच्या शतकी खेळीत पंचांचा मोलाचा वाटा, ऐन मोक्याच्या क्षणी घेतला असा निर्णय
Video| विराट कोहली याचं शतक व्हावं असं पंचांना देखील वाटतं होतं! 'त्या' निर्णयानंतर ड्रेसिंग रुममध्ये हास्यकल्लोळ
| Updated on: Oct 19, 2023 | 10:57 PM
Share

मुंबई : विराट कोहली हा भारताच्या भात्यातील प्रमुख अस्र आहे. फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गरज पडली तेव्हा गोलंदाजीही केली. विराट कोहली याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात संघाची बिकट स्थिती असताना केएल राहुलसोबत महत्त्वाची खेळी केली. चौथ्या गड्यासाठी 165 धावांची भागीदारी केली. तसेच 116 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 85 धावा केल्या. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यातही विराट कोहली याने नाबाद 55 धावा केल्या. तर बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात 97 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली. त्यामुळे विराट कोहली याचा फॉर्म टीम इंडियासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. पण बांगलादेश विरुद्धच्या शतकाची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. शतकी खेळी करण्यासाठी खटाटोप पाहून नेटकऱ्यांनी टीकाही केली आहे. पण सर्वात मोठी गंमत म्हणजे विराटचं शतक व्हावं म्हणून पंचांनीही खारीचा वाटा उचलला असंच म्हणावं लागेल.

बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमवून 256 धावा केल्या आणि विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलं. भारतानं हे आव्हान गाठण्यासाठी 42 षटकं घेतली. 41 षटकात भारताने 3 गडी बाद 255 धावा झाल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी अवघ्या दोन धावांची आवश्यकता होती. नसुम अहमद याच्याकडे 42वं षटक सोपवण्यात आलं. विराट कोहलीच्या 94 चेंडूत 97 धावा झाल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी 2 आणि शतकासाठी 3 धावा अशी स्थिती होती.

नसुम अहमदने पहिलाच चेंडू लेग साइडला टाकला. खरं तर हा चेंडू वाइड होता. पण पंचांनी हा चेंडू वाइड दिला नाही. त्यामुळे ड्रेसिंग रुममधील भारतीय खेळाडूंनाही हासू आवरलं नाही. समालोचन करणाऱ्या मोहम्मद कैफ आणि इरफान पठाण यांनीही गंमतीगंमतीत बरंच काही बोलून गेले. पंचांनी एक कटाक्ष विराट कोहलीकडे टाकला आणि गाळातल्या गाळात हसले. हा चेंडू निर्धाव गेला. हा चेंडू वाइड दिला असता तर विजयासाठी अवघी एक धाव हवी असती. तसेच शतक करणं कठीणही होऊ शकलं असतं.

नसुम अहमद याचा दुसरा चेंडूही निर्धाव गेला. पण विराट कोहली याने तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकला आणि संघाच्या विजयासह नाबाद 103 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना विराट कोहली याचं तिसरं शतक आहे.

Follow Us
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.