AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup : टीम इंडियाचा विजयरथ पाहून पाकिस्तानला पोटदुखी, खेळाडू मैदानात पोहोचू नये यासाठी सूचवलं असं काही

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील 8 पैकी 8 सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे पाकिस्तानला पोटदुखी झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा विजयरथ रोखण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना सूचवल्या जात आहेत.

World Cup : टीम इंडियाचा विजयरथ पाहून पाकिस्तानला पोटदुखी, खेळाडू मैदानात पोहोचू नये यासाठी सूचवलं असं काही
World Cup : टीम इंडियाची कामगिरी पाहून पाकिस्तानचा रडीचा डाव, खेळाडू आणि चाहत्यांना दिला अजब सल्ला
| Updated on: Nov 06, 2023 | 7:32 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने 8 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तसेच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेनेही उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पण उर्वरित दोन संघांसाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारताची स्पर्धेतील कामगिरी पाहून पाकिस्तानला पोटशूल झाला आहे. भारताचा विजयरथ कसा रोखावा यासाठी पाकिस्तानमध्ये जोरदार डिबेट सुरु आहे. यात भारताला रोखण्यासाठी काही अजब सल्ले देण्यात आले. हे सल्ले ऐकून कोणालाही हसू येईल. पाकिस्तानच्य ए स्पोर्ट्स चॅनेलवर क्रिकेटबाबतीत चर्चा असते. या चर्चेदरम्यान भारताला रोखण्यासाठी अजब सल्ला दिला. भारताला कसं रोखता येईल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वसीम अक्रमने सांगितलं की, ‘हा प्रश्न प्रत्येक संघाच्या डोक्यात असेल. मग ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका असो की न्यूझीलंड. कारण हा संघ खरंच चांगला खेळत आहे.’

वसीम अक्रमचं उत्तर संपल्या संपल्या अँकरने सांगितलं की, “वसीम अक्रम यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की भारताला पराभूत करण्यासाठी एकच उपाय आहे. तो म्हणजे खेळाडूंची बुटं आणि बॅट चोरा.” पण अँकर इतक्यावरच थांबला नाही. त्याने या उपायाची री ओढत आणखी एक सल्ला दिला. ‘मला वाटतं टीमच्या बसला टायर पंचर करावा. जेणेकरून टीम इंडिया मैदानात पोहोचणारच नाही.’ हा सल्ला ऐकून उपस्थित सर्वच हसायला लागले. हे सर्व संभाषण मस्करीत केलं जातं होतं.

मिस्बाह उल हकने उपांत्य फेरीबाबत केलं असं भाकीत

टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. याबाबत मिस्बाह उल हकने सांगितलं की, ‘उपांत्य फेरीचं गणित वेगळी असतात. जितकं टीम चांगली खेळते तितक्या अपेक्षा वाढतात. त्यामुळे भारताला दबाव झेलणं खूपच कठीण होईल.’ दुसरीकडे, शोएब मलिकने त्याला अडवत सांगितलं की, “भारत एक असा संघ आहे की दबावात सर्वात्तम कामगिरी करतो.”

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.