AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL Auction किती खेळाडू, केव्हा लागणार बोली? जाणून घ्या सर्वकाही

महिला आयपीएलला सुरुवात 4 मार्चपासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण 22 मॅच होणार आहेत. तर 26 मार्च रोजी अंतिम सामना पार पडणार आहे.

WPL Auction किती खेळाडू, केव्हा लागणार बोली? जाणून घ्या सर्वकाही
| Updated on: Feb 11, 2023 | 12:03 AM
Share

मुंबई : महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतेय. लवकरच स्पर्धेच्या पहिल्या हंगामाची प्रत्येक जण उत्सूकतेने वाट पाहत आहे. पहिल्या हंगामाला 3 आठवड्यांचा वेळ आहे. मात्र त्याआधी खेळाडूंचं ऑक्शन पार पडणार आहे. या ऑक्शनकडे सर्वाचं लक्ष आहे. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर महिला आयपीएलचं ऑक्शन पार पडणार आहे. ज्याप्रमाणे आयपीएलच्या ऑक्शनची उत्सूकता असते, त्याच प्रकारे महिला आयपीएलचंही नाव क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरलं जाणार आहे

बीसीसीआयने ट्विट करत महिला आयपीएलबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बीसीसीआयने ट्विट करत तारीख आणि खेळाडूंची यादी अशी सविस्तर माहिची दिली आहे. एकूण 5 टीम या महिला आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे. यासाठी ऑक्शन केव्हा पार पडणार आहे, याबाबतची माहिती दिलीय.

महिला आयपीएलमध्ये एकूण 5 संघ

बीसीसीआयने 26 जानेवारीला ऑक्शनसाठी 5 फ्रँचायजींची घोषणा केली होती. गुजरात जायंट्स, मुंबई इंडियस, आरसीबी, दिल्ली कॅपिट् आणि लखनऊची यूपी वॉरियर्स अशा 5 टीम्स आहेत.

ऑक्शन केव्हा आणि कुठे?

महिला आयपीएलसाठी ऑक्शन 13 फेब्रुवारीला पार पडणार आहे. हे ऑक्शन मुंबईतील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडणार आहे. या ऑक्शनला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

एकूण किती खेळाडू?

या महिला आयपीएलमधील लिलावासाठी एकूण 1 हजार 525 नोंदणी केली. यामधून 409 खेळाडूंची निवड करण्यात आली. या 409 खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. यामध्ये 246 भारतीय आणि 163 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर 8 असोसिएट देशांमधील खेळाडू आहेत.

महिला आयपीएलसाठीच्या प्रत्येक टीममध्ये जास्तीत जास्त 18 खेळाडूंना घेता येणार आहे. त्यानुसार 5 टीम एकूण 90 खेळाडू खरेदी करु शकते. यामध्ये 30 परदेशी खेळाडू असू शकतात.

महिला आयपीएलला सुरुवात 4 मार्चपासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण 22 मॅच होणार आहेत. तर 26 मार्च रोजी अंतिम सामना पार पडणार आहे. या स्पर्धेतील सामन्याचं आयोजन हे मुंबईतील बेब्रॉन आणि नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलंय.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...