AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी मैदानात उतरला युवराज सिंग, म्हणाला…

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका 3-1 ने गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टीकेची धनी ठरले आहे. त्यांच्यावर क्रीडाप्रेमींची नाराजी दिसून येत आहे. अशा स्थितीत माजी क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग युवराज त्यांची पाठराखण करण्यासाठी पुढे आला आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी मैदानात उतरला युवराज सिंग, म्हणाला...
| Updated on: Jan 07, 2025 | 6:09 PM
Share

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका गमावण्यासोबत टीम इंडियाच वर्ल्ड टेस्ट अंतिम फेरीचं स्वप्नही भंगलं आहे. भारताने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत शेवटचा सामना जिंकला असता तर कदाचित आशा अजून जिवंत असत्या. मात्र पराभवानंतर सर्वच गणित कोलमडून गेलं आहे. भारताची ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध सुमार कामगिरी राहिली आहे. खासकरून न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारताने 3-0 ने गमावली तिथेच सर्वकाही संपलं होतं. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत टीम इंडिया कमबॅक करेल असं वाटत होतं. पण पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर गाडी रुळावरून घसरली. खासकरून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला. रोहित शर्माच्या बॅटमधून धावाच आल्या नाहीत. तर विराट कोहली वारंवार विचित्र पद्धतीने बाद होत राहिला. त्यामुळे दोन्ही खेळाडू टीकेचे धनी ठरले आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग युवराज सिंग या दोन्ही खेळाडूंच्या मदतीला पुढे आला आहे. तसेच त्यांची पाठराखण केली आहे.

सिक्सर किंग युवराज सिंगने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा माझ्या कुटुंबाचा भाग आहेत. त्यामुळे कर्तव्य आहे की, मी त्यांना कुटुंब आणि एक भाऊ म्हणून पाठिंबा द्यावा. ते नक्कीच या संकटावर मात करून पुन्हा जोमाने खेळतील.’ तसेच या दोन्ही खेळाडूंची स्तुती करताना पुढे सांगितलं की, ‘विराट कोहली आणि युवराज सिंह हे दोन्ही मोठे क्रिकेटपटू आहेत. आपण आपल्या दिग्गज क्रिकेटपटूंबद्दल वाईट बोलणं योग्य नाही. त्यांनी भुतकाळात जे काही केलं आहे ते विसरून कसं चालेल. क्रिकेटपटूंवर टीका करणं सोपं आहे. आपल्याला क्रिकेटपटूंना पाठिंबा देण्याची गरज आहे. मला खात्री आहे की नक्कीच ते चांगलं करतील.’

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं असलं तरी टीम इंडियाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. फेब्रुवारी महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. यासाठी 12 जानेवारीला संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार यात काही शंका नाही. तर विराट कोहलीही या संघात असणार आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना वनडे फॉर्मेटमध्ये असलेल्या या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे.

Follow Us
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा.
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य.
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?.
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला.
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका.
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार.
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले.
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला.