AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : अक्षर पटेलला प्लेइंग 11 बाहेर राहण्यास कोणी भाग पाडलं? लज्जास्पद पराभवानंतर बॅटिंग कोचचा शॉकिंग खुलासा

T20 World Cup 2026 : टीम इंडियासाठी टी20 वर्ल्ड कपमधील पुढील दोन्ही सामने 'करो या मरो' बनले आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाची काही कारणं आहेत. त्यात अक्षर पटेलला प्लेइंग 11 बाहेर ठेवणं हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. आता अक्षरला बाहेर रहायला कोणी भाग पाडलं? त्याबद्दल शॉकिंग खुलासा झाला आहे.

T20 World Cup 2026 : अक्षर पटेलला प्लेइंग 11 बाहेर राहण्यास कोणी भाग पाडलं? लज्जास्पद पराभवानंतर बॅटिंग कोचचा शॉकिंग खुलासा
Team India Image Credit source: PTI
| Updated on: Feb 25, 2026 | 8:32 AM
Share

टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 च्या सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेने दारुण पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण बनलाय. फलंदाजांची खराब कामगिरी आणि अक्षर पटेलला प्लेइंग 11 बाहेर ठेवण्याचा निर्णय ही अहमदाबादमधील पराभवाची मुख्य कारणं आहेत. अक्षरच्या जागी प्लेइंग 11 मध्ये वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला होता. अक्षर पटेल टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. त्याला बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर अनेक क्रिकेट पंडितांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सोशल मीडियावरही अनेकांनी कमेंट्स करुन या निर्णयाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली.

अक्षर पटेलला प्लेइंग 11 बाहेर का ठेवलं?. या प्लानिंगमागचं कारण आता समोर आलय. भारताचे बॅटिंग कोच सितांशु कोटक या निर्णयाबद्दल बोलले आहेत. अक्षर पटेलला बाहेर का ठेवलं? त्यामागचं कारण त्यांनी सांगितलं. कोटक यांच्यानुसार कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि मुख्य कोच गौतम गंभीर यांनी मॅच आधी अक्षर पटेलसोबत दीर्घ चर्चा केली व त्याला प्लेइंग बाहेर का ठेवलं जातय? त्यामागची कारणं सांगितली. अक्षर पटेल टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. त्यामुळे या निर्णयावर प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे.

सितांशु कोटक काय म्हणाले?

सूर्या आणि गौतम दोघे त्याच्याशी बोलले असं कोटक यांनी सांगितलं. प्रतिस्पर्धी टीमच्या टॉप ऑर्डरमध्ये तीन डावखुरे फलंदाज होते. त्यामुळे एका ऑफ स्पिनरची गरज होती. आम्ही सुरुवातीचे विकेटही काढले. वॉशिंग्टनने पावरप्लेमध्ये गोलंदाजी केली नाही. खरंतर त्याने पावरप्लेमध्ये गोलंदाजी करणं अपेक्षित होतं. दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरमध्ये तीन डावखुरे फलंदाज होते. ती बाब ध्यानात घेऊन टीम मॅनेजमेंटने ऑफ स्पिनरला प्राधान्य दिलं असं कोटक यांनी सांगितलं. पण प्रत्यक्ष मॅचमध्ये गोलंदाजीच्या योजनेत बदल झाले.

पुढचे दोन्ही सामने करो या मरो

सुपर-8 राऊंडमधील एका पराभवामुळे टीम इंडियासाठी पुढचे दोन्ही सामने करो या मरो बनले आहेत. कोटक यांच्या मते खेळाडूंना असा दबाव झेलण्याची सवय आहे. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध मोठा विजय मिळवून सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

चौकशीला विलंब नको; अजित पवार विमान प्रकरणी आव्हाड आक्रमक
चौकशीला विलंब नको; अजित पवार विमान प्रकरणी आव्हाड आक्रमक.
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत...
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत....
राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा
राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा.
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप.
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार.
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका.
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?.
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन.
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह.
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.