AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20i World Cup 2026 : भारतावर सेमी फायनलमधून आऊट होण्याची टांगती तलवार, सूर्यासेनेच्या स्थितीला तिघे जबाबदार!

Team India T20i World Cup 2026 Semi final Qualification : टीम इंडियाने साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केली. मात्र सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यातील पराभवामुळे सेमी फायनलच्या हिशोबाने अडचणी वाढल्या आहेत.

T20i World Cup 2026 : भारतावर सेमी फायनलमधून आऊट होण्याची टांगती तलवार, सूर्यासेनेच्या स्थितीला तिघे जबाबदार!
| Updated on: Feb 24, 2026 | 11:54 PM
Share

साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या टीम इंडियावर सुपर 8 फेरीतील पहिल्या पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवार आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील सलग 4 सामने जिंकून रुबाबात सुपर 8 मध्ये प्रवेश केला. टीम इंडियासाठी साखळी फेरीतील 4 सामन्यात वेगवेगळे खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरले. यावरुन टीम इंडिया विजयासाठी कोणत्या एका खेळाडूवर अवलंबून नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे टीम इंडिया सुपर 8 फेरीतही धमाकेदार कामगिरी करेल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा गेम झाला.

रविवारी 22 फेब्रुवारीला सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यासाठी 2024 वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता आमनेसामने होते. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 76 धावांच्या मोठ्या फरकाने मात करत सलग पाचवा विजय मिळवला. टीम इंडियाला त्यामुळे दुहेरी फटका बसला. टीम इंडियाला पराभवासह नेट रनरेटमध्येही जबर फटका बसला. त्यामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलचं समीकरण फिस्कटलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला इथून एकही चुक परवडणारी नाही. तसेच भारताला सेमी फायनलमध्ये मोठ्या फरकाने जिंकावं लागणार आहे. मात्र टीम इंडिया इतकी अडचणीत कशी आली? या परिस्थितीला टीम इंडियाचे 3 खेळाडू जबाबदार आहेत. टीम इंडियाच्या त्या 3 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.

चौकशीला विलंब नको; अजित पवार विमान प्रकरणी आव्हाड आक्रमक
चौकशीला विलंब नको; अजित पवार विमान प्रकरणी आव्हाड आक्रमक.
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत...
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत....
राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा
राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा.
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप.
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार.
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका.
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?.
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन.
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह.
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.