T20i World Cup 2026 : भारतावर सेमी फायनलमधून आऊट होण्याची टांगती तलवार, सूर्यासेनेच्या स्थितीला तिघे जबाबदार!
Team India T20i World Cup 2026 Semi final Qualification : टीम इंडियाने साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केली. मात्र सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यातील पराभवामुळे सेमी फायनलच्या हिशोबाने अडचणी वाढल्या आहेत.

साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या टीम इंडियावर सुपर 8 फेरीतील पहिल्या पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवार आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील सलग 4 सामने जिंकून रुबाबात सुपर 8 मध्ये प्रवेश केला. टीम इंडियासाठी साखळी फेरीतील 4 सामन्यात वेगवेगळे खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरले. यावरुन टीम इंडिया विजयासाठी कोणत्या एका खेळाडूवर अवलंबून नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे टीम इंडिया सुपर 8 फेरीतही धमाकेदार कामगिरी करेल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा गेम झाला.
रविवारी 22 फेब्रुवारीला सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यासाठी 2024 वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता आमनेसामने होते. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 76 धावांच्या मोठ्या फरकाने मात करत सलग पाचवा विजय मिळवला. टीम इंडियाला त्यामुळे दुहेरी फटका बसला. टीम इंडियाला पराभवासह नेट रनरेटमध्येही जबर फटका बसला. त्यामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलचं समीकरण फिस्कटलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला इथून एकही चुक परवडणारी नाही. तसेच भारताला सेमी फायनलमध्ये मोठ्या फरकाने जिंकावं लागणार आहे. मात्र टीम इंडिया इतकी अडचणीत कशी आली? या परिस्थितीला टीम इंडियाचे 3 खेळाडू जबाबदार आहेत. टीम इंडियाच्या त्या 3 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.
