AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Womens T20 World Cup : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, विश्वविजयापासून एक पाऊल दूर

आयसीसी महिला टी 20 विश्वचषकात भारतीय महिला संघांने अंतिम फेरीत धडक मारली आहे. (Indian team ICC Womens T20 World Cup final)

ICC Womens T20 World Cup : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, विश्वविजयापासून एक पाऊल दूर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Mar 05, 2020 | 12:50 PM
Share

सिडनी :  आयसीसी महिला टी 20 विश्वचषकात भारतीय महिला संघांने अंतिम फेरीत धडक मारली आहे. (Indian team ICC Womens T20 World Cup final) विश्वचषक नावावर करण्यासाठी भारताला आता केवळ एका विजयाची गरज आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्याने, आधीच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ फायनल दाखल झाला. (Indian team ICC Womens T20 World Cup final)

भारतीय संघ अ गटात टॉपवर होता. त्याचाच फायदा आज भारतीय संघाला झाला. आता फायनलमध्ये भारताचा सामना 8 मार्चला होणार आहे. दुसऱ्या सेमीफायनलमधील विजेत्या संघ भारताशी भिडणार आहे.

ऑस्ट्रेलियातील सिडनीत सातत्याने पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. आयसीसीच्या नियमानुसार सकाळी 11 वाजता टॉस होणार होता. मात्र पावसाचा वेग पाहता, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामनाच रद्द करण्यात आला.

आयसीसीचा नियम

नियमानुसार, जर सेमीफायनलमध्ये पावसामुळे सामना रद्द झाला किंवा दोन्ही संघ किमान 10-10 षटकंही खेळू शकले नाहीत तर, संबंधित ग्रुपमधील संघाला फायनलचं तिकीट मिळेल. याच नियमाने भारतीय संघ फायनलमध्ये दाखल झाला.

टीम इंडिया 8 गुणांसह अ गटात तर दक्षिण आफ्रिका 7 गुणांसह ब गटात पहिल्या स्थानावर आहेत.

भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास

भारतीय महिला संघाने विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा पराभव करत इथवर मजल मारली. भारताने विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत