AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : संपूर्ण टुर्नामेंटमध्ये 2 ओव्हर 29 धावा दिल्या पण हाच दक्षिण आफ्रिकी गोलंदाज टीम इंडियासाठी सर्वात जास्त घातक

IND vs SA : संपूर्ण टुर्नामेंटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या या गोलंदाजाने 2 ओव्हर टाकून 29 धावा दिल्या आहेत. अजूनपर्यंत एकही विकेट काढलेला नाही. पण हाच गोलंदाज टीम इंडियासाठी सर्वात जास्त घातक ठरु शकतो. त्यामागे तसं कारणही खास आहे.

IND vs SA : संपूर्ण टुर्नामेंटमध्ये 2 ओव्हर 29 धावा दिल्या पण हाच दक्षिण आफ्रिकी गोलंदाज टीम इंडियासाठी सर्वात जास्त घातक
t20 wc 2026Image Credit source: PTI
| Updated on: Feb 21, 2026 | 4:15 PM
Share

टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 राऊंडमध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. त्याच टीमला दोन वर्षांपूर्वी हरवून भारताने टी20 वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलं होतं. दक्षिण आफ्रिकेने त्यावेळी सुद्धा टीम इंडियाला कडवं आव्हान दिलं होतं. आता पुन्हा एकदा ते टीम इंडियासमोर अडचणी निर्माण करु शकतात. दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये यावेळी सुद्धा काही चांगले खेळाडू आहेत. त्याच टीममध्ये संपूर्ण टुर्नामेंटमध्ये फक्त 2 ओव्हर टाकणारा एक असा खेळाडू आहे, जो टीम इंडियासमोर अडचणी निर्माण करु शकतो. त्या 2 ओव्हरमध्ये त्याची धुलाई झाली. हा खेळाडू आहे, दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्करम.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आतापर्यंतच सर्वात मजबूत टी20 संघ मानला जातोय. वर्ल्ड कपच्या आधी टीम इंडियाचं प्रदर्शन पाहिलं, तर हा दावा चुकीचा वाटत नाही. म्हणून टीम इंडियाला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हटलं जातय. टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाने अजूनपर्यंत आपल्या पूर्ण क्षमतेनुसार खेळ दाखवलेला नाही. कमीत कमी बॅटिंगमध्ये तरी तसं प्रदर्शन दिसलेलं नाही. वेगवेगळ्या प्रसंगी कुठल्या ना कुठल्या फलंदाजाची बॅट तळपली आहे. पण अजूनपर्यंत एकत्र, कुठल्या टीमच्या गोलंदाजांवर तुटून पडलेले नाहीत.

कुठल्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचे फलंदाज लाचार?

टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरच्या संघर्षाची वेगवेगळी कारणं आहेत. पण यावेळी एक अशी कमतरता दिसली आहे, प्रत्येक मॅचमध्ये प्रतिस्पर्धी टीम त्याचा फायदा घेत आहे. ऑफ ब्रेक गोलंदाजीसमोर टीम इंडियाचे फलंदाज लाचार वाटतायत. गेरहार्ड इरासमस, आगा सलमान, सॅम अयूब, उस्मान तारिक आणि आर्यन दत्त सारख्या स्पिनर्सनी टीम इंडियाच्या फलंदाजांना हैराण केलय. खासकरुन अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव खूप संघर्ष करताना दिसतात. या गोलंदाजांनी फक्त धावाच रोखल्या नाहीत, तर विकेटही काढले.

पण एकही विकेट मिळाला नाही

भारतीय टीममध्ये लेफ्टी फलंदाजांची संख्या जास्त आहे. त्यामुळे 22 फेब्रुवारीच्या संध्याकाळी भारतीय टीमचे फलंदाज बॅटिंगसाठी उतरतील, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन मार्करम त्यांना याच जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. त्याची जबाबदारी स्वत: मार्करम उचलेल. कारण तो ऑफ स्पिनर आहे. या वर्ल्ड कपमध्ये मार्करमची जितकी क्षमता आहे, तितका त्याने आपल्या कामचलाऊ फिरकीने तसा विशेष प्रभाव पाडलेला नाही. आतापर्यंत 4 सामन्यात त्याने 2 मॅचमध्ये गोलंदाजी केली. फक्त एक-एक ओव्हर टाकली. या 2 ओव्हरमध्ये त्याने 29 धावा दिल्या. पण एकही विकेट मिळाला नाही.

राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका..
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका...
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा..
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा...
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक.
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.
भाजप- संघाला कुठलाही धोका नाही; सुरक्षा घेऊन... संजय राऊतांचा घणाघात
भाजप- संघाला कुठलाही धोका नाही; सुरक्षा घेऊन... संजय राऊतांचा घणाघात.
सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट राज ठाकरे यांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट राज ठाकरे यांचा हल्लाबोल.
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले.