AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs Eng 2nd T20 : टीम इंडिया जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार, पराभवाचा वचपा काढणार?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा टी 20 सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. | India Vs England 2nd t20 Match

Ind Vs Eng 2nd T20 : टीम इंडिया जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार, पराभवाचा वचपा काढणार?
इंग्लंड विरुद्धचा दुसरा टी 20 सामना (india vs england 2nd t 20i) रविवारी 14 मार्चला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरकडून (shreyas iyer) मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 14, 2021 | 11:23 AM
Share

मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यातील दुसरा टी ट्वेन्टी सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Ground) खेळवण्यात येईल. या सामन्यात भारत विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल तसंच पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा भारत पूरेपूर प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यात बॅटिंगमध्ये झालेल्या चुका सुधारुन आता दुसऱ्या मॅचमध्ये साहेबांना पराभवाचं तोंड पाहायला लावण्याचा इरादा टीम इंडियाच्या खेळाडूंनी बोलून दाखवलाय. (India Vs England 2nd t20 Match Narendra Modi Ground)

कमबॅक कसं करायचं? ‘विराट सेनेला’ चांगलं माहिती…

खरंतर एका पराभवाने भारतीय संघ हार मानत नाही. कारण समस्त क्रिकेट रसिकांच्या डोळ्यासमोर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिका आहे. अगदी 36 धावांवर ऑलआऊट होऊन देखील भारतीय संघाने हार न मानता कांगारुंना त्यांच्यात भूमीत हरविण्याचा पराक्रम केला. साहजिक विराट सेनेला मालिकेत कमबॅक करणं काय असतं, हे चांगलंच ठाऊक आहे.

रोहित शर्माला आज संधी मिळणार का?

पहिल्या टी 20 सामन्यात हिटमॅन रोहित शर्माला संधी देण्यात आली नव्हती. त्याला आराम करण्यास सांगितलं गेलं होतं. रोहितच्या अनुपस्थिती भारतीय संघाला पावलोपावली जाणवली. आता दुसऱ्या टी 20 सामन्यात रोहित शर्मा खेळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. रोहितचा अंतिम 11 मध्ये संघात समावेश न होण्यावरुनही भारताचा दिग्गज क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती. भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने रोहितचा संघात समावेश नसल्याने विराटला सुनावलं होतं.

विराट कोहली आज मोठी खेळी करणार

गेल्या अनेक मॅचमध्ये विराट कोहलीची बॅट बोलली नाहीय. आज तरी ती तळपेल, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट रसिक करत आहेत. आज जर त्याच्या बॅटने कमाल केली तर भारतीय संघाला विजय मिळण्यापासून कुणी रोखू शकत नाही.

(India Vs England 2nd t20 Match narendra Modi Ground)

हे ही वाचा :

Video : टायगर अभी जिंदा हैं… युवीचे एकाच ओव्हरमध्ये गगनचुंबी 4 षटकार, पाहा डोळ्यांचं पारणं फेडणारा व्हिडीओ

देव कधी रिटायर होत नाही, सचिनचा धमाका, 30 चेंडूत तुफानी अर्धशतक!

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक