AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England 4th Test | चौथ्या कसोटीआधी विराटसेनेचा जोरदार सराव, इंग्लंडला पराभूत करण्यासाठी टीम इंडिया सज्ज

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

India vs England 4th Test | चौथ्या कसोटीआधी विराटसेनेचा जोरदार सराव, इंग्लंडला पराभूत करण्यासाठी टीम इंडिया सज्ज
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
| Updated on: Mar 01, 2021 | 7:14 PM
Share

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (Team India) यांच्यात कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी (4th Test) सामना 4 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. ही चौथी कसोटी टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship 2021) दृष्टीने महत्वाची असणार आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी हा सामना जिंकावा किंवा अनिर्णित राखावा लागणार आहे. या उद्देशाने भारताच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. या सरावादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. (india vs england 4th test Strong practice of Indian players)

या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय खेळाडू हे बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंगचा सराव करताना दिसत आहेत. तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसत आहेत.

बुमराहची माघार

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली होती. यामुळे चौथ्या टेस्टमध्ये बुमराहच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून

दरम्यान या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.

कसोटीनंतर रंगणार टी 20 चा थरार

या कसोटी मालिकेनंतर उभय संघात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 12 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजमधील सर्व सामन्यांचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच करण्यात आले आहे.

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

संबंधित बातम्या :

Vijay Hazare Trophy | ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरची 92 धावांची सुस्साट खेळी, हिमाचल प्रदेशवर शानदार विजय

Video | ‘या’ तरुणाने अवघ्या 17 सेकंदात सोडवले रूबिक क्यूबचे कोडे, सचिनही झाला फॅन

(india vs england 4th test Strong practice of Indian players)

Follow Us
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.