AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England 2021 | टीम इंडियाला भारतात सलग 13 वी कसोटी मालिका जिंकण्याची संधी

टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या (india vs england test series) कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. या सीरिजमधील चौथा आणि अखेरचा सामना 4 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे.

India vs England 2021 |  टीम इंडियाला भारतात सलग 13 वी कसोटी मालिका जिंकण्याची संधी
टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या (india vs england test series) कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. या सीरिजमधील चौथा आणि अखेरचा सामना 4 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे.
| Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 03, 2021 | 8:58 AM
Share

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (india vs england test series) यांच्यात 4 मार्चपासून कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. ही चौथी कसोटी टीम इंडियासाठी मालिका विजय आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने (world test championship) महत्वाची असणार आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पोहचण्यासाठी हा सामना जिंकावा किंवा अनिर्णित करावा लागणार आहे. या दोन्ही पैकी काहीही झाल्यास टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळेल. तसेच यासह टीम इंडियाचा भारतातील 13 वा मालिका विजय ठरेल. (india vs england test series team india have chance to 13 consecutive series win at home)

2012 मध्ये अखेरचा मालिका पराभव

इंग्लंडने टीम इंडियाला भारतातच 2012 मध्ये कसोटी मालिकेत पराभूत केलं होतं. त्यानंतर भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावली नाही. टीम इंडियाने भारतात 2019 मध्ये अखेरची कसोटी मालिका जिंकली होती. तेव्हा बांगलादेशचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला होता. हा भारताचा 12 वा मालिका विजय ठरला होता. टीम इंडियानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या देशात खेळताना सलग 2 वेळा 10-10 कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे.

मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकणारे संघ

भारत- सलग 12 सीरीज, फेब्रुवारी 2013 ते आतापर्यंत

ऑस्ट्रेलिया- सलग 10 मालिका विजय, नोव्हेंबर 1994 ते नोव्हेंबर 2000

ऑस्ट्रेलिया- 10 कसोटी मालिका, जुलै 2004 ते नोव्हेंबर 2008

वेस्टइंडिज- 8 मालिका विजय, मार्च 1976 ते फेब्रुवारी 1996

इंग्लंड- 7 सीरीज, मे 2009 ते मे 2012

साउथ अफ्रीका- 7 सीरीज, मार्च 1998 ते नोव्हेंबर 2001

टीम इंडियाने भारतात इंग्लंड विरुद्धच्या 2012 च्या कसोटी मालिकेनंतर आतापर्यंत एकूण 37 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. यापैकी 30 सामन्यांमध्ये विजय झाला आहे. तर 2 मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर 5 सामने हे अनिर्णित राहिले होते. ऑस्ट्रेलियाने सलग 10 टेस्ट सारीज जिंकल्या आहेत. यात त्यांनी 27 पैकी 20 सामन्यांमध्ये विजयश्री मिळवली. तर केवळ 2 सामने गमावले.

टीम इंडियाने भारतात जिंकलेल्या कसोटी मालिका

प्रतिस्पर्धी संघ,   विजयी अंतर,  वर्ष

ऑस्ट्रेलिया, 4-0 (4),  फेब्रुवारी 2013

वेस्टइंडीज,  2-0 (2), नोव्हेंबर 2013

साउथ अफ्रिका,  3-0 (4), नोव्हेंबर 2015

न्यूझीलंड,  3-0 (3), सप्टेंबर 2016

इंग्लंड,  4-0 (5), नोव्हेंबर 2016

बांग्लादेश,  1-0 (1), फेब्रुवारी 2017

ऑस्ट्रेलिया,  2-1 (4), फेब्रुवारी 2017

श्रीलंका,  1-0 (3), नोव्हेंबर 2017

अफगानिस्तान, 1-0 (1), जून 2018

वेस्टइंडीज,  2-0 (2), ऑक्टोबर 2018

साउथ अफ्रिका,  3-0 (3), ऑक्टोबर 2019

बांगलादेश,  2-0 (2), नोव्हेंबर 2019

संबंधित बातम्या :

फिरकीपटू अश्विन चतुर गोलंदाज, लक्ष्मणने उलगडलं यशाचे रहस्य

ICC Player of the Month Award | आयसीसीकडून 3 खेळाडूंना नामांकन, इंग्लंड विरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विनही स्पर्धेत

टीम इंडियाने योग्य खेळपट्टी तयार करावी, अहमदाबाद पीचच्या वादानंतर शोएब अख्तरचा सल्ला

(india vs england test series team india have chance to 13 consecutive series win at home)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या