AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत वि. न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द, आता पुढे काय?

पावसामुळे नाणेफेकही करता आली नाही. यामुळे इंग्लंडमध्ये सामना पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांची मोठी निराशा झाली आहे. सामन्याची सुरुवात तर दूरच, पण नाणेफेकही करता आली नाही.

भारत वि. न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द, आता पुढे काय?
| Edited By: | Updated on: Jun 13, 2019 | 8:04 PM
Share

लंडन : विश्वचषकामध्ये पावसाचा व्यत्यय सुरुच आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ आली. दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आलाय. भारताकडे विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी होती. पण पावसामुळे नाणेफेकही करता आली नाही. यामुळे इंग्लंडमध्ये सामना पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांची मोठी निराशा झाली आहे. सामन्याची सुरुवात तर दूरच, पण नाणेफेकही करता आली नाही.

सामना सुरु करण्यासाठी ग्राऊंड स्टाफकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. पंचही मैदानात आले आणि पाहणी केली. पण काही क्षणातच पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. पावसाने उसंत न घेतल्याने अखेर सामना रद्द करण्याची वेळ आली. 20 षटकांचा सामना होईल, असं बोललं जात होतं. पण एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही.

विश्वचषकात खेळत असलेल्या 10 संघांच्या गुणतालिकेत भारत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा पहिला क्रमांक कायम आहे. भारताच्या खात्यात 3 सामन्यांमध्ये 5, तर न्यूझीलंडच्या खात्यात 4 सामन्यांमध्ये 7 गुण आहेत. आजचा सामना जिंकून भारताला दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियालाही मागे टाकण्याची संधी होती. भारताचा पुढचा सामना 16 तारखेला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

विश्वचषकात आतापर्यंत पावसामुळे रद्द झालेले सामने

इंग्लंडमध्ये पाऊस क्रिकेटची कधीही पाठ सोडत नाही. यापूर्वीही अनेकदा विश्वचषकात सामने रद्द करण्याची वेळ आली आहे. 1979 मध्ये ओव्हलच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. 2015 मध्ये ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. तर यावर्षी ब्रिस्टलमध्ये श्रीलंका विरुद्ध बांगलादेश हा सामना वाया गेला. यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.