IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज

आयपीएलचे उर्वरित 31 सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयने हा निर्णय घेऊन तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं आहे. (IPL has been moved to UAE for IPL 2021 Season BCCI Vice president Rajeev Shukla)

IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Bcci President Sourav Ganguly)
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 2:17 PM

मुंबई : जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलच्या 14 व्या पर्वाबाबत (IPL 2021) स्पर्धेबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित 31 सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयने हा निर्णय घेऊन तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं आहे. आता अतिशय कमी वेळेत उर्वरित सामन्यांचं आयोजन बीसीसीआयला करावं लागणार आहे. कमी वेळेत स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणं बीसीसीआय समोरचं मोठं आव्हान असणार आहे. (IPL has been moved to UAE for IPL 2021 Season BCCI Vice president Rajeev Shukla)

आयपीएलच्या 14 व्या पर्वातले 31 सामने उरले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवली होती. यंदा मात्र आयपीएलचे (IPL 2021) सामने भारतात खेळवण्यात आले. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने ऐन रंगात आलेली आयपीएल स्पर्धा 4 मे रोजी स्थगित करण्यात आली होती.

BCCI ची महत्त्वाची बैठक मोठी घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज विशेष कार्यकारिणीचं (Special Genral Meeting)  आयोजन केलं होतं. बीसीसीआयने आजच्या बैठकीत भारतातील कोरोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचे वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

अन्यथा BCCI ला 3000 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं असतं…!

आयपीएलचा 14 वा हंगाम पुन्हा सुरु झाला नसता तर बीसीसीआयला सुमारे 3000 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागेल. कारण अनेक कंपन्याची स्पॉन्सरशीप आयपीएलल स्पर्धेला होती. त्यामुळे बीसीसीआयला कोणत्याही परिस्थितीत 14 वं सत्र पूर्ण करायचं होतं. त्यामुळे बीसीसीआयने मोठा निर्णय घेत मोठा आर्थिक तोटा टाळण्यासाठी उर्वरित सामन्यांचं आयोजन यूएईमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.

30 दिवसात 31 सामने खेळवणार?

भारताचा इंग्लंड दौरा 18 जूनला सुरु होऊन 14 सप्टेंबरला संपेल. भारत-इंग्लंड मालिकेत कोणताही बदल झाला नाही तरी टी – 20 वर्ल्ड कपपूर्वी बीसीसीआयकडे एक महिन्याची (15 सप्टेंबर – 15 ऑक्टोबर) विंडो असेल. या 30 दिवसांत भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना ब्रिटनहून युएईला आणण्यासाठी संपूर्ण दिवस लागणार आहे. बाद फेरीसाठी 5 दिवस बाजूला ठेवावे लागतील. अशा परिस्थितीत बीसीसीआयकडे 27 सामने पूर्ण करण्यासाठी 24 दिवसांचा कालावधी असेल. या विंडोमध्ये 8 शनिवार-रविवार आहेत. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक शनिवार व रविवारी दोन सामने खेळवले तर महिन्यात 16 डबल हेडर सामने खेळवले जाऊ शकतात. उर्वरित 19 दिवसांत 11 सामने खेळवता येतील.

यूएईमध्येच आयपीएलचं आयोजन का

पहिलं कारण –  सप्टेंबरमध्ये युएईचेहवामान अधिक चांगले असते. तिथे सप्टेंबरमध्ये पावसाचा धोका नाही.

दुसरं कारण – युएईमध्ये इतर देशांच्या तुलनेत कमी खर्चात स्पर्धा पार पडणार आहे.

तिसरं कारण –  आयपीएल स्पर्धा यापूर्वी युएईमध्ये झाल्या आहेत आणि त्या यशस्वीही झाल्या आहेत. 13 वा हंगाम यूएईमध्ये पार पडण्याअगोदर 2014 हंगामातील काही आयपीएलचे सामनेही तिथे खेळले गेले होते.

(IPL has been moved to UAE for IPL 2021 Season BCCI Vice president Rajeev Shukla)

हे ही वाचा :

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

BCCI SGM : टी 20 वर्ल्डकप भारतात होणार की नाही? BCCI ची विशेष बैठक, IPL बाबतही मोठा निर्णय अपेक्षित

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.