AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेत भारताची विजयी सलामी, हरमनप्रीत सिंहची हॅटट्रीक

आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेला सुरुवात झाली असून भारताने विजयी सलामी दिली आहे. ही स्पर्धा हॉकी वर्ल्डकप स्पर्धेच्या पात्रतेसाठी खूपच महत्त्वाची आहे. भारतीय संघ या स्पर्धेच्या जेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. त्यामुळे भारतासाठी प्रत्येक विजय महत्त्वाचा आहे.

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेत भारताची विजयी सलामी, हरमनप्रीत सिंहची हॅटट्रीक
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेत भारताची विजयी सलामी, हरमनप्रीत सिंहची हॅटट्रीकImage Credit source: Hockey India Twitter
| Updated on: Aug 29, 2025 | 5:57 PM
Share

आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारत आणि चीन हे संघ आमनेसामने आले होते. बिहारच्या राजगीरध्ये हा सामना खेळला गेला. पहिल्याच सामन्यात भारताने चीनला 4-3 ने मात दिली. या सामन्यात भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंहने तीन गोल मारले. चीनने पहिला गोल 12 मिनिटाला मारला आणि भारतावर दबाव आणला होता. मात्र त्यानंतर जुगराज सिंहने 18 व्या मिनिटाला गोल केला आणि बरोबरी साधली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने 20 व्या आणि 33 व्या मिनिटाला गोल करत 3-1 अशी आघाडी घेतली. चीनकडून चेन बेनहाईने 35 व्या मिनिटाला गोल मारला आणि 3-2 अशी स्थिती आणली. त्यानंतर गाओ जिशेंगने 41 व्या मिनिटला गोल मारला आणि 3-3 अशी बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटतो की काय अशीस स्थिती होती. पण कर्णधार हरमनप्रीत कौरने 47 व्या मिनिटाला गोल मारला आणि सामना आपल्या पारड्यात झुकवला. भारताने हा सामना 4-3 ने जिंकला.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात गोलची हॅटट्रीक मारली. त्याच्या तीन गोलमुळेच भारताला विजय मिळवणं शक्य झालं. पहिला गोल त्याने 20 व्या मिनिटाला केला. दुसरा गोल तिसऱ्या सत्राच्या तिसऱ्या मिनिटाला केला. पेनल्टी कॉर्नरचं रुपांतर गोलमध्ये केलं. तसेच शेवटच्या सत्राच्या दुसऱ्या मिनिटाला निर्णायक गोल मारला. हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नर मारत संघाला 4-3 ने विजय मिळवून दिला. आता भारताचा पुढचा जापानशी होणार आहे. हा सामना 31 ऑगस्टला होणार आहे. भारताच्या गटात चीन, कझाकिस्तान आणि जापान हे संघ आहेत. त्यापैकी चीनला साखळी फेरीत मात दिली आहे.

आशिया कप स्पर्धेचं हे 12वं पर्व असून भारताने तीन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2003, 2007 आणि 2017 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. तसं पाहिलं तर दक्षिण कोरियाचा या स्पर्धेत दबदबा राहिला आहे. त्यांनी पाचवेळा जेतेपद मिळवलं आहे. 1994, 1999, 2013 आणि 2022 मध्ये विजय मिळवला आहे. आता या स्पर्धेत भारत प्रमुख दावेदार आहे. भारताने जेतेपद मिळवलं तर बेल्जियम-नेदरलँडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत पात्र ठरेल.

आशिया हॉकी कपसाठी भारतीय संघ

  • गोलकीपर: सूरज करकेरा, कृष्ण बहादुर पाठक.
  • डिफेंडर: हरमनप्रीत सिंह (कर्णधार), अमित रोहिदास, जरमनप्रीत सिंह, सुमित, संजय, जुगराज सिंह.
  • मिडफील्डर: मनप्रीत सिंह, विवेक सागर प्रसाद, राजिंदर सिंह, राज कुमार पाल, हार्दिक सिंह.
  • फॉरवर्ड: मनदीप सिंह, अभिषेक, सुखजीत सिंह, दिलप्रीत सिंह, शिलानंद लाकड़ा

Follow Us
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट