AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाने योग्य खेळपट्टी तयार करावी, अहमदाबाद पीचच्या वादानंतर शोएब अख्तरचा सल्ला

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अवघ्या दुसऱ्या दिवशीच निकाली निघाला. त्यामुळे खेळपट्टीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

टीम इंडियाने योग्य खेळपट्टी तयार करावी, अहमदाबाद पीचच्या वादानंतर शोएब अख्तरचा सल्ला
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अवघ्या दुसऱ्या दिवशीच निकाली निघाला. त्यामुळे खेळपट्टीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
| Updated on: Mar 02, 2021 | 3:40 PM
Share

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 2021) यांच्यातील तिसरा कसोटी सामना अवघ्या दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच निकाली निघाला. भारताने पाहुण्या इंग्लंडवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवल मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. सामना दुसऱ्या दिवशीच संपल्याने इंग्लंड टीमसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही खेळपट्टी खेळण्याच्या लायकीची नसल्याचं, अनेकांनी म्हटलं. तर या खेळपट्टीवर बंदी टाकण्याचीही मागणी करण्यात आली. त्यात आता पाकिस्तानाच माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) आपली प्रतिक्रिया दिली आहे. (pakistan former faster bowler shoaib akhtar on ahmedabad pitch)

अख्तर काय म्हणाला?

“अशा पीचवर सामन्याचे आयोजन करुन नये. तसेच टीम इंडिया कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर विजय मिळवू शकते. त्यासाठी टीम इंडियाला टर्न असलेल्या पीचची आवश्यकता नाही. ज्या पीचवर चेंडू टर्न घेतो, अशा खेळपट्टीवर सामना अजिबात खेळवला नाही पाहिजे. अवघ्या 2 दिवसात सामना संपतो. हे टेस्ट क्रिकेटसाठी बरोबर नाही. मायदेशात खेळण्याचा फायदा मी समजू शकतो. पण हे काही झालं ते जरा जास्तच होतं. टीम इंडियाने 400 धावा केल्या. तसेच इंग्लंडने 200 धावा केल्या तर समजू शकतो. पण या तिसऱ्या कसोटीत दोन्ही संघांची घसरगुंडी झाली”, असं मत अख्तरने आपल्या युट्युब चॅनेलवरुन व्यक्त केलं.

“टीम इंडिया फार मजबूत”

“टीम इंडिया फार मजबूत आहे. भारताला विजय मिळवण्यासाठी अशा प्रकारची खेळपट्टी बनवण्याची आवश्यकता नाही. टीम इंडियाने योग्य खेळपट्टी तयार करुन खेळण्याची गरज आहे. टीम इंडियामध्ये इंग्लंडला पराभूत करण्याची क्षमता आहे. भारताला घाबरण्याची आवश्यकता नाही. तसेच डे नाईट सामन्यासाठी अहमदाबाद सारखी खेळपट्टी तयार करण्याचीही गरज नाही. भारतीय संघाने यावर लक्ष देण्याची गरज आहे”, असंही अख्तरने नमूद केलं.

चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून

या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज.

संबंधित बातम्या :

On This Day | 116 धावांचा यशस्वी बचाव, जाडेजाच्या फिरकीची धमाल, विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा U 19 वर्ल्ड कप विजय

टीम इंडियाला झटका, बुमराहची चौथ्या कसोटीसह वनडे, टी-20 मालिकेतून माघार, थेट IPL मध्ये खेळणार?

(pakistan former faster bowler shoaib akhtar on ahmedabad pitch)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...