AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाने योग्य खेळपट्टी तयार करावी, अहमदाबाद पीचच्या वादानंतर शोएब अख्तरचा सल्ला

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अवघ्या दुसऱ्या दिवशीच निकाली निघाला. त्यामुळे खेळपट्टीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

टीम इंडियाने योग्य खेळपट्टी तयार करावी, अहमदाबाद पीचच्या वादानंतर शोएब अख्तरचा सल्ला
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अवघ्या दुसऱ्या दिवशीच निकाली निघाला. त्यामुळे खेळपट्टीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
| Updated on: Mar 02, 2021 | 3:40 PM
Share

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 2021) यांच्यातील तिसरा कसोटी सामना अवघ्या दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच निकाली निघाला. भारताने पाहुण्या इंग्लंडवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवल मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. सामना दुसऱ्या दिवशीच संपल्याने इंग्लंड टीमसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही खेळपट्टी खेळण्याच्या लायकीची नसल्याचं, अनेकांनी म्हटलं. तर या खेळपट्टीवर बंदी टाकण्याचीही मागणी करण्यात आली. त्यात आता पाकिस्तानाच माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) आपली प्रतिक्रिया दिली आहे. (pakistan former faster bowler shoaib akhtar on ahmedabad pitch)

अख्तर काय म्हणाला?

“अशा पीचवर सामन्याचे आयोजन करुन नये. तसेच टीम इंडिया कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर विजय मिळवू शकते. त्यासाठी टीम इंडियाला टर्न असलेल्या पीचची आवश्यकता नाही. ज्या पीचवर चेंडू टर्न घेतो, अशा खेळपट्टीवर सामना अजिबात खेळवला नाही पाहिजे. अवघ्या 2 दिवसात सामना संपतो. हे टेस्ट क्रिकेटसाठी बरोबर नाही. मायदेशात खेळण्याचा फायदा मी समजू शकतो. पण हे काही झालं ते जरा जास्तच होतं. टीम इंडियाने 400 धावा केल्या. तसेच इंग्लंडने 200 धावा केल्या तर समजू शकतो. पण या तिसऱ्या कसोटीत दोन्ही संघांची घसरगुंडी झाली”, असं मत अख्तरने आपल्या युट्युब चॅनेलवरुन व्यक्त केलं.

“टीम इंडिया फार मजबूत”

“टीम इंडिया फार मजबूत आहे. भारताला विजय मिळवण्यासाठी अशा प्रकारची खेळपट्टी बनवण्याची आवश्यकता नाही. टीम इंडियाने योग्य खेळपट्टी तयार करुन खेळण्याची गरज आहे. टीम इंडियामध्ये इंग्लंडला पराभूत करण्याची क्षमता आहे. भारताला घाबरण्याची आवश्यकता नाही. तसेच डे नाईट सामन्यासाठी अहमदाबाद सारखी खेळपट्टी तयार करण्याचीही गरज नाही. भारतीय संघाने यावर लक्ष देण्याची गरज आहे”, असंही अख्तरने नमूद केलं.

चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून

या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज.

संबंधित बातम्या :

On This Day | 116 धावांचा यशस्वी बचाव, जाडेजाच्या फिरकीची धमाल, विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा U 19 वर्ल्ड कप विजय

टीम इंडियाला झटका, बुमराहची चौथ्या कसोटीसह वनडे, टी-20 मालिकेतून माघार, थेट IPL मध्ये खेळणार?

(pakistan former faster bowler shoaib akhtar on ahmedabad pitch)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.