टीम इंडियाने योग्य खेळपट्टी तयार करावी, अहमदाबाद पीचच्या वादानंतर शोएब अख्तरचा सल्ला

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अवघ्या दुसऱ्या दिवशीच निकाली निघाला. त्यामुळे खेळपट्टीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

टीम इंडियाने योग्य खेळपट्टी तयार करावी, अहमदाबाद पीचच्या वादानंतर शोएब अख्तरचा सल्ला
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अवघ्या दुसऱ्या दिवशीच निकाली निघाला. त्यामुळे खेळपट्टीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 3:40 PM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 2021) यांच्यातील तिसरा कसोटी सामना अवघ्या दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच निकाली निघाला. भारताने पाहुण्या इंग्लंडवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवल मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. सामना दुसऱ्या दिवशीच संपल्याने इंग्लंड टीमसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही खेळपट्टी खेळण्याच्या लायकीची नसल्याचं, अनेकांनी म्हटलं. तर या खेळपट्टीवर बंदी टाकण्याचीही मागणी करण्यात आली. त्यात आता पाकिस्तानाच माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) आपली प्रतिक्रिया दिली आहे. (pakistan former faster bowler shoaib akhtar on ahmedabad pitch)

अख्तर काय म्हणाला?

“अशा पीचवर सामन्याचे आयोजन करुन नये. तसेच टीम इंडिया कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर विजय मिळवू शकते. त्यासाठी टीम इंडियाला टर्न असलेल्या पीचची आवश्यकता नाही. ज्या पीचवर चेंडू टर्न घेतो, अशा खेळपट्टीवर सामना अजिबात खेळवला नाही पाहिजे. अवघ्या 2 दिवसात सामना संपतो. हे टेस्ट क्रिकेटसाठी बरोबर नाही. मायदेशात खेळण्याचा फायदा मी समजू शकतो. पण हे काही झालं ते जरा जास्तच होतं. टीम इंडियाने 400 धावा केल्या. तसेच इंग्लंडने 200 धावा केल्या तर समजू शकतो. पण या तिसऱ्या कसोटीत दोन्ही संघांची घसरगुंडी झाली”, असं मत अख्तरने आपल्या युट्युब चॅनेलवरुन व्यक्त केलं.

“टीम इंडिया फार मजबूत”

“टीम इंडिया फार मजबूत आहे. भारताला विजय मिळवण्यासाठी अशा प्रकारची खेळपट्टी बनवण्याची आवश्यकता नाही. टीम इंडियाने योग्य खेळपट्टी तयार करुन खेळण्याची गरज आहे. टीम इंडियामध्ये इंग्लंडला पराभूत करण्याची क्षमता आहे. भारताला घाबरण्याची आवश्यकता नाही. तसेच डे नाईट सामन्यासाठी अहमदाबाद सारखी खेळपट्टी तयार करण्याचीही गरज नाही. भारतीय संघाने यावर लक्ष देण्याची गरज आहे”, असंही अख्तरने नमूद केलं.

चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून

या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज.

संबंधित बातम्या :

On This Day | 116 धावांचा यशस्वी बचाव, जाडेजाच्या फिरकीची धमाल, विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा U 19 वर्ल्ड कप विजय

टीम इंडियाला झटका, बुमराहची चौथ्या कसोटीसह वनडे, टी-20 मालिकेतून माघार, थेट IPL मध्ये खेळणार?

(pakistan former faster bowler shoaib akhtar on ahmedabad pitch)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.