AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘WORLD CUP टीममध्ये दुखापतग्रस्त केदार जाधव ऐवजी ऋषभ पंतला संधी द्यावी’

नवी दिल्ली : IPL 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या केदार जाधवच्या तंदुरुस्तीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. तो भारतीय वर्ल्ड कप टीमचाही सदस्य आहे.  अशास्थितीत त्याचे विश्वचषकासाठी संघात पुनरागमन होणार की नाही याबद्दल शंका व्यक्त होत आहे. यावर माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांनी केदार जाधव तंदुरुस्त झाला नाही, तर त्याच्या जागेवर ऋषभ पंतला संधी देण्याची […]

‘WORLD CUP टीममध्ये दुखापतग्रस्त केदार जाधव ऐवजी ऋषभ पंतला संधी द्यावी’
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

नवी दिल्ली : IPL 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या केदार जाधवच्या तंदुरुस्तीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. तो भारतीय वर्ल्ड कप टीमचाही सदस्य आहे.  अशास्थितीत त्याचे विश्वचषकासाठी संघात पुनरागमन होणार की नाही याबद्दल शंका व्यक्त होत आहे. यावर माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांनी केदार जाधव तंदुरुस्त झाला नाही, तर त्याच्या जागेवर ऋषभ पंतला संधी देण्याची मागणी केली आहे.

केदार जाधवने IPL च्या या हंगामात 14 सामने खेळले. मात्र, दुखापतग्रस्त झाल्याने त्याला प्लेऑफचा एकही सामना खेळता आला नाही. केदार जाधव लवकरच तंदुरुस्त होईल असा अंदाज व्यक्त केला गेला होता. मात्र, सध्या त्याच्यातील सुधारणांचा वेग पाहता त्याला पुनरागमन करायला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ प्रशासनासमोरचा मोठा पेच

भारतीय संघाचे फिजियो पॅट्रिक फरहत ऑस्ट्रेलियातून भारतात परतले आहे. त्यांनी मुंबईत कॅम्पही सुरु केला आहे. त्यामुळे आता केदार जाधव वेळेवर तंदुरुस्त होणार की नाही यावर अनेकांचे लक्ष लागून आहे. पहिल्या सामन्याआधी जाधव तंदुरुस्त झाला नाही, तरी तो दुसऱ्या सामन्यापर्यंत फिट होईल, असाही अंदाज लावला जात आहे. त्यामुळे यावर काय निर्णय घ्यायचा? हा भारतीय संघ प्रशासनासमोरचा मोठा पेच आहे.

‘वर्ल्ड कप अगोदर भारतीय संघाने कमीत कमी सामने खेळायला हवेत’

माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांच्यानुसार भारतीय संघातील खेळाडूंसमोर तंदुरुस्त राहणे हेच मोठे आव्हान असणार आहे. ते म्हणाले, “वर्ल्ड कप अगोदर भारतीय संघाने कमीत कमी सामने खेळायला हवेत. भारताच्या संघाचे लक्ष्य तंदुरुस्त असण्यावर असावे. कसोटी सामन्यांआधी सराव सामन्यांची आवश्यकता असते. मात्र, एकदिवसीय सामन्यासाठी तशी आवश्यकता नसते.”

‘पंत 10 षटकांमध्ये सामन्याची दिशा बदलू शकतो’

ऋषभ पंतला दुखापतग्रस्त केदार जाधवच्या जागेवर संधी देण्याबाबत ते म्हणाले, “भारतीय संघाला यशासाठी तंदुरुस्ती महत्वाची आहे. केदार जाधवच्या तंदुरुस्तीबाबत संशय आहे. जर तो फिट झाला नाही, तर मला त्याच्या जागेवर ऋषभ पंतला संघात पाहायला आवडेल. तो एक असा खेळाडू आहे जो विरोधी संघातील गोलंदाजांवर वरचढ ठरु शकतो आणि सामना जिंकण्यास मदत करु शकतो. पंत 10 षटकांमध्ये अथवा अर्ध्या तासात सामन्याची दिशा बदलू शकतो. विश्वचषकात विजय मिळवण्यासाठी अशा खेळाडूंची गरज असते. तो कधी कधी चुकीचे शॉट्स खेळतो, मात्र एक खेळाडू संघात अधिकाधिक सामने खेळतच शिकत असतो. तो ‘लम्बी रेसचा घोडा’ आहे.”

सध्या 3 खेळाडूंना राखीव म्हणून ठेवले आहे. त्यात गोलंदाज नवदीप सैनी, यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि अंबाती रायडूचा समावेश आहे. कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास यापैकी एकाला संधी मिळेल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.