AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: जे आयर्लंडविरुद्ध गमावलं ते इंग्लंडविरुद्ध कमावलं; कॅप्टन श्रेयस अय्यरचा अनोखा पराक्रम; विराट-रोहितला जे जमलं नाही ते करुन दाखवलं

भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला टी-20 सामना रंगला. या सामन्यात संपूर्ण 40 षटकांचा खेळ होऊ शकला नाही. भारतीय फलंदाजांनी 20 षटके खेळलीत पण नंतर पावसामुळे उर्वरित 20 षटकांचा खेळ होऊ शकला नाही. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने एक पराक्रम केला.

IND vs ENG: जे आयर्लंडविरुद्ध गमावलं ते इंग्लंडविरुद्ध कमावलं; कॅप्टन श्रेयस अय्यरचा अनोखा पराक्रम; विराट-रोहितला जे जमलं नाही ते करुन दाखवलं
shreyas iyer
| Updated on: Jul 02, 2026 | 9:00 AM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना काल पूर्णपणे रंगू शकला नाही कारण पाऊस. पावसामुळे प्रभावित असलेल्या सामन्यात फक्त 20 षटकांचा खेळ झाला. उर्वरित 20 षटकांचा खेळ होऊ शकला नाही. या पहिल्या टी-20 सामन्याची नाणेफेक ही भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 189 धावा केल्या. भारताचा नवा टी-20 कर्णधार श्रेयस अय्यरसाठी आयर्लंड दौरा ही एक कटू आठवण आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अर्धशतक झळकावून त्याने आपली क्षमता सिद्ध केली. अर्धशतक पूर्ण केल्यावर श्रेयसने अशी कामगिरी केली, जी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत करता आली नव्हती.

आयर्लंडविरुद्ध 2-0 ने पराभव झाल्यानंतर, एकही धाव न काढल्यामुळे श्रेयस अय्यरवर प्रचंड टीका झाली. तसेच, भारताला 2026 च्या टी-20 विश्वचषकात नेणाऱ्या कर्णधाराची जागाही त्याने घेतली होती. या सर्व आव्हानांना झुगारून देत, अय्यरने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 47 चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एका षटकारासह 68 धावा केल्या. 15व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत, तो इंग्लंडच्या भूमीवर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. 2018 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडचा दौरा केला होता. त्यानंतर, 2022 मध्ये रोहित शर्मा कर्णधार होता. दोन्ही खेळाडूंना हा अनोखा विक्रम साधता आला नाही.

श्रेयस अय्यरच्या खेळीच्या जोरावर, प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडसमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले. सुरुवातीला अभिषेक शर्माने गोलंदाजांना चोपले. त्याने 24 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांसह 59 धावा केल्या. अखेरीस, शिवम दुबेने नाबाद 42 धावांची खेळी करून भारताला 189 धावांपर्यंत पोहोचवले. श्रेयस अय्यरने पहिल्या सामन्यात फलंदाज म्हणून आपले काम चोख बजावले. पण त्याला कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करावे लागेल. आयपीएलमध्ये 60% विजयाची टक्केवारी मिळवून त्याने दाखवून दिले आहे की त्याच्यामध्ये कर्णधाराचे गुण आहेत, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे, आणि तेही अशा फॉरमॅटमध्ये ज्यात तो जवळपास दोन वर्षे संघाबाहेर होता.

Follow Us
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवका
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवकांनी... अखेर ज्याची भीती तेच घडलं
लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप
Abhijeet Dipke | लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप, नेमकं काय घडलं?
थोड्याच वेळात शिवसेना चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील सरोदेंचं वक्तव्य
अध्यक्षांनी साक्ष, पुरावे, प्रश्नोत्तरे सगळंच... थोड्याच वेळात शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील असीम सरोदेंचं विधान चर्चेत
संजय राऊतांकडे तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी...
संजय राऊतांकडे तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी नेमकं काय घडलं?
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमा
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमाईंडर नोटीस, आता...
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?