AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडिया पुनरागमन, पण प्लेईंग 11 मध्ये स्थान नाही ! पृथ्वी शॉने स्पष्टच सांगितलं काय झालं?

पृथ्वी शॉ ची टीम इंडियामध्ये नुकतीच निवड झाली होती. पण त्यालाा प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्यावर आता पृथ्वी शॉनं आपलं मत मांडलं आहे.

टीम इंडिया पुनरागमन, पण प्लेईंग 11 मध्ये स्थान नाही ! पृथ्वी शॉने स्पष्टच सांगितलं काय झालं?
प्लेईंग 11 मध्ये संधी न मिळाल्याने पृथ्वी स्पष्टच म्हणाला, "माझ्या आधी..."
| Updated on: Mar 06, 2023 | 7:13 PM
Share

मुंबई : पृथ्वी शॉ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं नाव आहे. मग तो वाद असो की, टीम इंडियातील त्याची निवड. न्यूझीलँडविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी पृथ्वी शॉची संघात निवड करण्यात आली होती. पण असं असलं तरी त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये काही स्थान मिळालं नाही. कारण संघात त्याच्याऐवजी शुभमन गिलला स्थान देण्यात आलं. पहिल्या दोन सामन्यात फेल गेल्यानंतर गिलनं तिसऱ्या सामन्यात शतक ठोकलं आणि आपली दावेदारी आणखी मजबूत केली. पृथ्वी शॉने शेवटचा सामना जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. संघात पुन्हा निवड होऊनही प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्याबद्दल खुद्द पृथ्वी शॉनं मौन सोडलं आहे.

“मला टी 20 संघात पुन्हा स्थान मिळाल्याबद्दल आणि सराव करण्याची संधी मिळाल्याने आनंद वाटला. हा पण मला संधी मिळाली नाही. असं असलं तरी संघात पुनरागमन करण्याची संधी दिली हे माझ्यासाठी खूप काही आहे. आता सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे की, संघात कधी खेळायचं कधी नाही. मी त्यांच्या निर्णयाचा आदर करतो.”, असं पृथ्वी शॉ याने सांगितलं.

“त्यांनी माझ्याऐवजी अशा व्यक्तीला संधी दिली जी व्यक्ती खरंच चांगली खेळत आहे. अशाच मला कोणत्याच पश्चाताप होत नाही. मी संधी शोधतच राहाणार आणि लक्ष्य गाठण्यासाठी मी सज्ज आहे. भारतीय संघासोबत मी ते लक्ष्य गाठेल.”, असं पृथ्वी शॉ याने पुढे सांगितलं.

“मी चांगल्या धावा करत आहे पण मला वाटतं इतकं पुरेसं नाही.मला अजून चांगल्या धावा करणं गरजेचं आहे. मग मी 379 धावा केल्या. तो माझा दिवस होता आणि ही संधी मी जाऊ दिली नाही. कधी वाईट वाटतं की, प्रयत्न करूनही संघात का नाही? पण कधीही तितका उशीर होत नाही.”, असं सांगत पृथ्वी शॉने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत गेल्या काही दिवसात चांगली कामगिरी केली आहे. रणजी ट्रॉफीतील एका सामन्यात 379 धावांची खेळी केली. 383 चेंडू खेळतातना त्याने 49 चौकार आणि 4 षटकार ठोकले. त्यानंतर सैय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत 363 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलँडविरुद्धच्या सामन्यात संघात पुनरागमन झालं.

भारत विरुद्ध न्यूझीलँड मालिका संपल्यानंतर पृथ्वी शॉ नुकताच एका वादात अडकला होता. अभिनेत्री सपना गिल आणि त्यांच्या मित्रांसोबत वाद झाला होता. रस्त्यावर मारहाणीच्या घटनेनंतर पृथ्वी शॉ चर्चेत आला होता. त्यानंतर सपना आणि तिच्या मित्रांना अटक करण्यात आली होती.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.