AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vikas Kohli : टीम इंडियावर वाईट वेळ येताच विराट कोहलीच्या भावाने सुद्धा सुनावलं, सोशल मिडिया पोस्टवरुन मोठा वाद

Vikas Kohli : टीम इंडियाचे सध्या खराब दिवस सुरु आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरीज गमावण्याच्या स्थितीमध्ये टीम आहे. अशावेळी विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने टीम इंडियाच्या निवडीवरुन बरच काही सुनावलं आहे. त्याच्या पोस्टवरुन मोठा वाद झाला आहे.

Vikas Kohli : टीम इंडियावर वाईट वेळ येताच विराट कोहलीच्या भावाने सुद्धा सुनावलं, सोशल मिडिया पोस्टवरुन मोठा वाद
Virat Kohli brother Vikas
| Updated on: Nov 26, 2025 | 9:34 AM
Share

टीम इंडिया सध्या अडचणीत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत बरोबरी सोडा, सिरीज गमावण्याचं संकट आहे. हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. ते माजी क्रिकेटपटुंच्या रडारवर आहेत. टीमच्या सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खराब प्रदर्शनामुळे टीम इंडियावर वाईट वेळ ओढवली आहे. या कठिण परिस्थितीत विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहलीने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. विकास कोहलीने उपरोधिकपणे टीमवर निशाणा साधला. “आधी आपण परदेशात सुद्धा जिंकण्यासाठी खेळायचो. आता आपल्या घरात मॅच वाचवण्यासाठी खेळतोय. जेव्हा विनाकारण तुम्ही बॉस बनण्याचा प्रयत्न करता, आधीपासून व्यवस्थित सुरु असलेल्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करता तेव्हा असच होतं” असं विकास कोहलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. नंतर त्याने ती पोस्ट डिलिट केली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटी येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. टीम इंडिया हा कसोटी सामना गमावण्याच्या उंबरठ्यावर आहे. पहिला कोलकाता येथील कसोटी सामना भारताने 30 धावांनी गमावला. दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 288 धावांची आघाडी घेतली. चौथ्या दिवस अखेर भारताची वाईट अवस्था झाली. दुसरा डाव आफ्रिकेने 260/5 धावांवर घोषित केला. भारताने दुसऱ्या डावात दोन विकेट गमावले आहेत. आज टीम इंडियाला विजयासाठी 522 धावांची गरज आहे. आज कसोटी सामना ड्रॉ झाला, तरी मालिका दक्षिण आफ्रिकेची टीम 1-0 ने जिंकेल.

गौतम गंभीर यांच्या नावावर होईल या खराब कामगिरीची नोंद

ही सीरीज 0-2 ने हरलो, तर मायदेशात दोन कसोटी मालिका गमावणारे गौतम गंभीर भारतीय टेस्ट इतिहासातील पहिले कोच बनतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत चार पैकी दोन कसोटी मालिका भारताने मायदेशात गमावल्या आहेत. एकूण 18 कसोटी सामन्यापैकी 7 टेस्ट जिंकल्या आहेत. 9 मध्ये पराभव झालाय. दक्षिण आफ्रिकेची टीम फॉर्ममध्ये आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेते आहेत. भारताच्या जुन्या कमकुवत बाजू समोर आल्या आहेत. फॅन्स निराश आहेत. विराट कोहलीच्या कॅप्टनशिपचे जुने दिवस आठवत आहेत. त्यावेळी टीम इंडिया मायदेशात चॅम्पियन होती.

Follow Us
संजय राऊत, तटकरेंच्या वक्तव्यात विरोधाभास, ठाकरे, राष्ट्रवादीच्या बैठक
संजय राऊत, तटकरेंच्या वक्तव्यात विरोधाभास, ठाकरे, राष्ट्रवादीच्या बैठक.
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव नाही
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव नाही.
खरात इथूनच करायचा काळे धंदे, मुंबईत 5 स्टार हॉटेलमधील रुम 365 दिवस बुक
खरात इथूनच करायचा काळे धंदे, मुंबईत 5 स्टार हॉटेलमधील रुम 365 दिवस बुक.
बारामती पोटनिवडणुकीसाठी त्या बड्या नेत्याचा पाठिंबा
बारामती पोटनिवडणुकीसाठी त्या बड्या नेत्याचा पाठिंबा.
दादर स्थानकावर प्रचंड गर्दी... एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा
दादर स्थानकावर प्रचंड गर्दी... एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा.
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती.
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप.
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा.
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.