AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेंनाच कायम ठेवण्याची इच्छा होती : VVS

विशाखापट्टणम : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांनाच कायम ठेवण्याची इच्छा होती, असं भारताचा माजी कसोटीवीर व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटलंय. 2016 मध्ये अनिल कुंबळे यांच्या नियुक्तीची शिफारस सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) केली होती. इंडिया टुडेच्या कार्यक्रमात लक्ष्मणने हा खुलासा केला. कुंबळे प्रशिक्षक असताना भारताने चांगली कामगिरी केली. […]

प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेंनाच कायम ठेवण्याची इच्छा होती : VVS
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM
Share

विशाखापट्टणम : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांनाच कायम ठेवण्याची इच्छा होती, असं भारताचा माजी कसोटीवीर व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटलंय. 2016 मध्ये अनिल कुंबळे यांच्या नियुक्तीची शिफारस सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) केली होती. इंडिया टुडेच्या कार्यक्रमात लक्ष्मणने हा खुलासा केला.

कुंबळे प्रशिक्षक असताना भारताने चांगली कामगिरी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपर्यंत मजल मारली. पण यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील मतभेद समोर आले. भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाला. ही मालिका आटोपताच कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.

अनिल कुंबळेने भारताचा कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणूनही अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. कोहलीने मर्यादा पार केल्या, असं वाटत नाही. सीएसीने विचार केला, की कुंबळेच प्रशिक्षक पाहिजे. पण पद सोडण्याचा निर्णय योग्य असल्याचं कुंबळेने सांगितलं. आमच्यावर सर्वात बेस्ट प्रशिक्षक देण्याची जबाबदारी होती. आम्ही यासाठी कुंबळेंची निवड केली, पण दुर्दैवाने विराट आणि कुंबळे यांच्यात जमलं नाही, असं लक्ष्मणने सांगितलं.

2017 मध्ये कुंबळेंनी राजीनामा दिल्यानंतर प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. ज्यामध्ये, रवी शास्त्री, टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग, इंग्लंडचे क्रिकेटर रिचर्ड पायबस, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर टॉम मुडी आणि लालचंद राजपूत यांच्या नावाचा समावेश होता.

रवी शास्त्री आणि विराट कोहली यांचे संबंध चांगले असल्याचं बोललं जातं. अनेक नावांवर विचार करुनही सीएसीला अखेर विराटच्या म्हणण्यानुसार रवी शास्त्रींचीच निवड करावी लागली. विराटच्या मागणीपुढे सीएसीही हतबल झाल्याचं या निमित्ताने समोर आलंय.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.