AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup : ‘जो कोणी भारताला हरवेल, तो विश्वचषक जिंकेल’

विश्वचषकात 30 जून रोजी टीम इंडियाचा सामना यजमान इंग्लंडविरुद्ध होणार आहे.  भारताने या विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही. गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताने तब्बल 125 धावांनी विजय मिळवला.

World Cup : 'जो कोणी भारताला हरवेल, तो विश्वचषक जिंकेल'
| Edited By: | Updated on: Jun 30, 2019 | 10:25 AM
Share

लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. जो संघ भारतीय संघाला हरवेल, तो संघ वर्ल्डकप जिंकेल, असं वॉनने म्हटलं  आहे. वॉनने ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

विश्वचषकात 30 जून रोजी टीम इंडियाचा सामना यजमान इंग्लंडविरुद्ध होणार आहे.  भारताने या विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही. गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताने तब्बल 125 धावांनी विजय मिळवला.

भारताने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांना हरवून गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं आहे. भारताच्या खात्यात 11 गुण आहेत.

भारताच्या या फॉर्ममुळे मायकल वॉनने ट्विट करत, जो संघ भारताला हरवेल, तो वर्ल्डकप जिंकेल असं म्हटलं आहे.

दरम्यान, भारताने सलग 5 विजय मिळवले असले, तरी अलिकडच्या दोन सामन्यांमध्ये भारताची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळल्याचं पाहायला मिळालं. अफगाणिस्तानविरुद्ध भारताची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. शिवाय वेस्ट इंडिजविरुद्धही भारतीय फलंदाज विशेष कामगिरी करु शकले नाहीत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांना करुन दाखवावं लागेल, अन्यथा इंग्लंडमधील भारताचं आव्हान कठीण होऊ शकतं.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.